शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वन मजुरांचे वेतन अडल्याने उपासमारीची पाळी

By admin | Updated: May 25, 2015 01:43 IST

चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर अंतर्गत सावली, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर व चिचपल्ली आदी वनपरिक्षेत्र कार्यालय असून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात ....

मूल : चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर अंतर्गत सावली, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर व चिचपल्ली आदी वनपरिक्षेत्र कार्यालय असून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत बारमाही वन मजुरांना गेल्या मार्च महिन्यापासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. सावली, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा परिक्षेत्रातील वनमजुरांना नियमित वेतन मिळत असताना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनमजुरांना वेतन देण्यासंदर्भात वेगळा शासन निर्णय आहे का, असा प्रश्न उपस्थित करुन वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण यांच्या अरेरावीपणामुळे वनमजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्याचे मजुरांकडून बोलले जात आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने २२ आॅगस्ट २०१२ ला शासन परिपत्रक निर्गमीत करुन बफर व नॉन बफर अशी विभागनी केली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर, शिवनी, पळसगाव, मूल, मोहुर्ली, खडसंगी आदी परिक्षेत्रातील ५७१.८२ चौ किमी क्षेत्र आरक्षित करण्यात आले. तसेच नॉन बफर येथील चंद्रपूर वनविभाग चंद्रपूरमध्ये चंद्रपूर चिचपल्ली, वरोरा, भद्रावती, सावली या परिक्षेत्राचा समावेश असून ६२०.३५ चौ. किमी क्षेत्र आरक्षित करण्यात आले. यातील कर्मचारी, वनमजूर यांची बफ व नॉन बफरमध्ये पदस्थापना करण्यात आली. चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर येथे शेकडो वनमजूर कार्यरत असून वन्यप्राण्याचे व वृक्षाचे संरक्षण कार्यालयीन कामकाज आदी निमूटपणे केले जात आहे. वनमजुरांवर जबाबदारी सोपवून अधिकारी मात्र झोपा घेताना दिसतात. मात्र केलेल्या कामाचा मोबदला देण्यास ते दिरंगाई करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.जणू ते आपल्याच खिशातील पैसा वनमजुरांना देतात की काय, असा आव आणतात. असलाच प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सुरु असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर वनविभाग चंद्रपूरमधील उर्वरित सावली, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा क्षेत्रातील कार्यरत वनमजुरांना नियमित वेतन मिळत असताना मात्र चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनमजुरांना वेतन गेल्या तीन महिन्यापासून मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. वैद्यकीय उपचार, नातेवाईकांचे लग्न, किराणा सामान आदी बाबींची पूर्तता करण्यात अडचणीचे जात आहे. शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या अशा वनपरिक्षेत्राधिकारी यांची उचलबांगडी होणे गरजेचे असल्याचे मत मजुरांकडून व्यक्त केले जात आहे. हिच स्थिती चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील इतरही कामाबाबत असावी असे बोलले जात आहे. वनपरिक्षेत्रामधील वनमजुरांची होणारी उपासमार थांबविण्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)