शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:48 IST

तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देपशुपालक शेतकरी हैराण : चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये चराईसाठी काही वर्षांपूर्वी शासनाने राखीव जमीन ठेवली होती. पण राजकीय नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले. शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण नसताना बोगस पट्टे तयार करून बांबू व इतर झाडांची कत्तल केली. त्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे धानशेतीच्या बांध्या तयार केल्या. चराईचे क्षेत्र नष्ट केल्याने शेतकºयांना जनावरे चराईसाठी कुठे न्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी अन्य पाळीव प्राणी पालन करतात.यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती परंतु या जनावरांना चारण्याकरिता आता जागाच शिल्लक नाही. चराईचे क्षेत्र नष्ट करून त्यावर शेती केली जात आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे धानपिकाचे पुरेसे उत्पादन होत नाही. जनावरांना चाऱ्यासाठी मिळणारी तणससुद्धा मिळणे दुरापास्त झाले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जनावरांची विक्री केल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक विचार केल्यास आजमितीस अनेक ेगावांतील जनावरांमध्ये मोठी घट झाली.