शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:48 IST

तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देपशुपालक शेतकरी हैराण : चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये चराईसाठी काही वर्षांपूर्वी शासनाने राखीव जमीन ठेवली होती. पण राजकीय नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले. शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण नसताना बोगस पट्टे तयार करून बांबू व इतर झाडांची कत्तल केली. त्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे धानशेतीच्या बांध्या तयार केल्या. चराईचे क्षेत्र नष्ट केल्याने शेतकºयांना जनावरे चराईसाठी कुठे न्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी अन्य पाळीव प्राणी पालन करतात.यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती परंतु या जनावरांना चारण्याकरिता आता जागाच शिल्लक नाही. चराईचे क्षेत्र नष्ट करून त्यावर शेती केली जात आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे धानपिकाचे पुरेसे उत्पादन होत नाही. जनावरांना चाऱ्यासाठी मिळणारी तणससुद्धा मिळणे दुरापास्त झाले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जनावरांची विक्री केल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक विचार केल्यास आजमितीस अनेक ेगावांतील जनावरांमध्ये मोठी घट झाली.