शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
2
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
3
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
4
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
5
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
6
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
7
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
8
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
9
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
10
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
11
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
12
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
13
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
15
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
16
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
17
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
19
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
20
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:35 IST

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाºया धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुर्दशा कायम : वारंवार तक्रार केल्यानंतरही कुणी लक्ष देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाऱ्या धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.राजुरा तालुक्यातील बहुतांश रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वेकोलि परिसरातील बहुतांश रस्ते धुळीने माखले आहे. गोवरी-पोवनी, साखरी, वरोडा, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्गावर रस्त्याच्या धुळीने रस्त्यालगत असलेली पिके पूर्णत: काळवंडली आहे. या रस्त्यावर दिवसरात्र जड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून रस्त्याचे बारा बाजले आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच धूळ उडत असते. धुळीमुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णत: खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला रस्त्याची दूरवस्था कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने पिकांचा टवटविपणा निघून जातो.परिणामी पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. वेकोलि परिसरातून जाणारे बहुतांश रस्ते सदैव धुळीने माखले असतात. शेतपिके रस्त्यालगत असल्याने त्याचा मोठा परिणाम पिकांवर होऊन पिके काळवंडली जातात. या धुळीचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.कापूस वेचणीला मजूर येईनारस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने पिकांवरही धुळीचा थर जमा झाला आहे. पिकांत गेले तरी कपडे पूर्णत: काळेकुट्ट होतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणीला मजूरही येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना घरातील सदस्य घेऊ नच नाईलाजाने कापूस वेचणी करावी लागत आहे.कधी उजळणार ग्रामीण रस्त्याचे भाग्य ?राजुरा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणाात हाल होत आहे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. असे असतानाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.