शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:35 IST

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाºया धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुर्दशा कायम : वारंवार तक्रार केल्यानंतरही कुणी लक्ष देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाऱ्या धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.राजुरा तालुक्यातील बहुतांश रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वेकोलि परिसरातील बहुतांश रस्ते धुळीने माखले आहे. गोवरी-पोवनी, साखरी, वरोडा, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्गावर रस्त्याच्या धुळीने रस्त्यालगत असलेली पिके पूर्णत: काळवंडली आहे. या रस्त्यावर दिवसरात्र जड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून रस्त्याचे बारा बाजले आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच धूळ उडत असते. धुळीमुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णत: खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला रस्त्याची दूरवस्था कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने पिकांचा टवटविपणा निघून जातो.परिणामी पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. वेकोलि परिसरातून जाणारे बहुतांश रस्ते सदैव धुळीने माखले असतात. शेतपिके रस्त्यालगत असल्याने त्याचा मोठा परिणाम पिकांवर होऊन पिके काळवंडली जातात. या धुळीचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.कापूस वेचणीला मजूर येईनारस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने पिकांवरही धुळीचा थर जमा झाला आहे. पिकांत गेले तरी कपडे पूर्णत: काळेकुट्ट होतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणीला मजूरही येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना घरातील सदस्य घेऊ नच नाईलाजाने कापूस वेचणी करावी लागत आहे.कधी उजळणार ग्रामीण रस्त्याचे भाग्य ?राजुरा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणाात हाल होत आहे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. असे असतानाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.