शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:35 IST

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाºया धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुर्दशा कायम : वारंवार तक्रार केल्यानंतरही कुणी लक्ष देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाऱ्या धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.राजुरा तालुक्यातील बहुतांश रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वेकोलि परिसरातील बहुतांश रस्ते धुळीने माखले आहे. गोवरी-पोवनी, साखरी, वरोडा, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्गावर रस्त्याच्या धुळीने रस्त्यालगत असलेली पिके पूर्णत: काळवंडली आहे. या रस्त्यावर दिवसरात्र जड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून रस्त्याचे बारा बाजले आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच धूळ उडत असते. धुळीमुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णत: खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला रस्त्याची दूरवस्था कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने पिकांचा टवटविपणा निघून जातो.परिणामी पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. वेकोलि परिसरातून जाणारे बहुतांश रस्ते सदैव धुळीने माखले असतात. शेतपिके रस्त्यालगत असल्याने त्याचा मोठा परिणाम पिकांवर होऊन पिके काळवंडली जातात. या धुळीचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.कापूस वेचणीला मजूर येईनारस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने पिकांवरही धुळीचा थर जमा झाला आहे. पिकांत गेले तरी कपडे पूर्णत: काळेकुट्ट होतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणीला मजूरही येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना घरातील सदस्य घेऊ नच नाईलाजाने कापूस वेचणी करावी लागत आहे.कधी उजळणार ग्रामीण रस्त्याचे भाग्य ?राजुरा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणाात हाल होत आहे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. असे असतानाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.