शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास संपता संपेना

By admin | Updated: June 24, 2015 01:32 IST

अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली पोलीस चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास अद्यापही संपला नाही. मागील हिवाळ्यात सुरू झालेले पोलीस चौकीचे बांधकाम अद्यापही अपूर्ण असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना टिनाच्या शेडमध्ये बसून आपले कर्त्यव्य पार पाडावे लागत आहे.पोलीस खाते हे अतिशय शिस्तीचे असल्याने खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांना मुकाटपणे आहे त्या परिस्थितीशी तडजोड करून हालअपेष्टा सहन करीत कर्तव्य बजवावे लागते. अनेकदा हिच परिस्थिती प्रसंगी त्यांच्या जीवावरही बेतत असते. असे असतानाही वरिष्ठांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठच लक्ष देत नसतील तर कैफियत मांडायची तरी कुणाकडे, या प्रश्नाने महाकाली पोलीस चौकीतील कर्मचारी सध्या अस्वस्थ आहेत. मागील हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमधे महाकाली चौकीच्या नुतनीकरणासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत टिनाच्या शेडमधे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवस काढलेत. उन्हाळ्यातील ४८ अंश तापमानात कोणतीही कुरबुर न करता पोलिसांनी कामकाज सांभाळले. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र ओली झाली. विषेश म्हणजे सोमवारी ओलाव्या मुळे संपूर्ण चौकीच्या भिंतीत वीज प्रवाह शिरला. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी तसेच एका तक्रारकर्त्यालाही विजेचा शॉक लागला. मात्र मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेनंतर तातडीने वीज कारागिराला बोलावून तपासणी केली असता, भिंतीत सर्वत्र वीज प्रवाह असल्याचे लक्षात आले. लवकर हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी येथील कर्मच्याऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे.हिवाळ्यात नवी चौकी उभारण्यासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यात नव्या चौकीचे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. उन्हाळ्यात तरी आपल्याला नव्या इमारतीत काम करता येईल, या आशेपोटी पोलीस कर्मचाऱ्यांनी थंडीतील दिवस काढलेत. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या कासवगतीने हे काम उन्हाळ्यातही पूर्ण झाले नाही. त्यामुळे ४८ अंश तापमानातही तेथील पोलीसांना तापत्या टिनाच्या शेडखालीच काम करण्याची वेळ आली. तेथील पोलिसांचा वनवास येथेच संपला नाही. तर आता पावसाळा सुरू होवूनही हे बांधकाम पूर्ण न झाल्याने भर पावसात त्यांना याच शेडखाली बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहे.