शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास संपता संपेना

By admin | Updated: June 24, 2015 01:32 IST

अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली पोलीस चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास अद्यापही संपला नाही. मागील हिवाळ्यात सुरू झालेले पोलीस चौकीचे बांधकाम अद्यापही अपूर्ण असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना टिनाच्या शेडमध्ये बसून आपले कर्त्यव्य पार पाडावे लागत आहे.पोलीस खाते हे अतिशय शिस्तीचे असल्याने खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांना मुकाटपणे आहे त्या परिस्थितीशी तडजोड करून हालअपेष्टा सहन करीत कर्तव्य बजवावे लागते. अनेकदा हिच परिस्थिती प्रसंगी त्यांच्या जीवावरही बेतत असते. असे असतानाही वरिष्ठांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठच लक्ष देत नसतील तर कैफियत मांडायची तरी कुणाकडे, या प्रश्नाने महाकाली पोलीस चौकीतील कर्मचारी सध्या अस्वस्थ आहेत. मागील हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमधे महाकाली चौकीच्या नुतनीकरणासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत टिनाच्या शेडमधे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवस काढलेत. उन्हाळ्यातील ४८ अंश तापमानात कोणतीही कुरबुर न करता पोलिसांनी कामकाज सांभाळले. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र ओली झाली. विषेश म्हणजे सोमवारी ओलाव्या मुळे संपूर्ण चौकीच्या भिंतीत वीज प्रवाह शिरला. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी तसेच एका तक्रारकर्त्यालाही विजेचा शॉक लागला. मात्र मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेनंतर तातडीने वीज कारागिराला बोलावून तपासणी केली असता, भिंतीत सर्वत्र वीज प्रवाह असल्याचे लक्षात आले. लवकर हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी येथील कर्मच्याऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे.हिवाळ्यात नवी चौकी उभारण्यासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यात नव्या चौकीचे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. उन्हाळ्यात तरी आपल्याला नव्या इमारतीत काम करता येईल, या आशेपोटी पोलीस कर्मचाऱ्यांनी थंडीतील दिवस काढलेत. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या कासवगतीने हे काम उन्हाळ्यातही पूर्ण झाले नाही. त्यामुळे ४८ अंश तापमानातही तेथील पोलीसांना तापत्या टिनाच्या शेडखालीच काम करण्याची वेळ आली. तेथील पोलिसांचा वनवास येथेच संपला नाही. तर आता पावसाळा सुरू होवूनही हे बांधकाम पूर्ण न झाल्याने भर पावसात त्यांना याच शेडखाली बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहे.