शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

घाणीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: May 28, 2016 01:11 IST

चांदगाव रस्त्यालगत बऱ्यापैकी वस्ती निर्माण झाली आहे. पण या रस्त्याला लागून घाणीचे साम्राज्य व रस्त्याच्या दुतर्फा अनावश्यक झाडे वाढलेली आहेत.

नगरपालिकेचे दुर्लक्ष : अनुचित घटना घडण्याची शक्यताब्रह्मपुरी : चांदगाव रस्त्यालगत बऱ्यापैकी वस्ती निर्माण झाली आहे. पण या रस्त्याला लागून घाणीचे साम्राज्य व रस्त्याच्या दुतर्फा अनावश्यक झाडे वाढलेली आहेत. यामुळे या वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ब्रह्मपुरी शहराची वाढ चारही बाजूने मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण त्या मानाने सुविधा पुरविण्यात यंत्रणा सक्षम नसल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. चांदगाव रोड हा रात्रंदिवस वर्दळीचा रस्ता आहे. या परिसरात शेकडो नागरिक घरे बांधून राहत आहेत. या रस्त्याने चांदगाव व इतरत्र खेडोपाडी जाणारे- येणारे नागरिक असंख्य आहेत. शिवाजी चौकापासून नाल्यांचे घाण पाणी या परिसरणात साचून मोठा डबका तयार झाला आहे. हा डबक्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. या घाणीच्या डबक्यात डुकरे, कुत्रे दिवसभर बसून राहत असल्याने महिलांना व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या दुर्तफा अनावश्यक वनस्पतीचे जंगल वाढल्याने रस्त्यावरील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात नागरिकांनी प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासनाच्या विरुद्ध असंतोष पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने लक्ष घालून समस्या सोडविण्याची मागणी प्रा. भागवत खुणे, मार्कंडराव गहाणे, बाळकृष्ण मासूरकर, भीमराव पाटील, मनिष झोडे व अन्य रहिवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)