लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव: नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शेकडोहुन अधिक शेतकºयांचे धान पीक मावा तुडतुडा या रोगाने उद्ध्वस्त झाले आहे. संपूर्ण पिकाची तणस झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी कर्जबाजारी व आर्थिकदृष्टया दुर्बल झाला आहे. येथील कृषी सहाय्यक जयश्री आर. माटे यांनी कृषी मित्र चेतन लोणारे यांच्यासोबत काही शेतकºयांच्या शेताची पाहणी केली व त्यांच्या नावाची यादी बनविणे सुरु केले. याबाबत शासनाकडून काही आदेश आहेत काय, असे लोकमत प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता त्यांनी शासनाचे कुठलेही आदेश नसल्याचे सांगितले. मात्र तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांना पाहणी करण्यास सांगितले असल्याची माहिती कृषी सहाय्यक जयश्री माटे यांनी दिली. दरम्यान, हे सर्वेक्षण कोरडा दिलासा तर नाही ना, असे काही सुशिक्षित शेतकऱ्यांचे या संदर्भात म्हणणे आहे. याकडे आता परिसरातील लोकप्रतिनीधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी विभागानेही याबाबत सकारात्मक बघावे, अशी मागणी आहे.
कोणताही सरकारी आदेश नसताना कृषी सहाय्यक काही विशिष्ट शेतकºयांच्या शेतात जाऊन मावा तुडतुडा या रोगाने नष्ट झालेल्या पिकांची पाहणी व नाव नोंद करीत आहेत. खरोखर शेतकºयांना मोबदला मिळणार आहे का? की शेतकºयांची ही थट्टा सुरु आहे, हे कळेनासे झाले आहे.- प्रवीण खोब्रागडेशेतकरी तथा माजी सरपंचग्रा.पं. सावरगाव ता.नागभीड.