शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:03 IST

‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या

अतिवृष्टीचा फटका : आठवडाभर पाण्यात राहून बियाणे सडले गेवरा : ‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ आणि चालू खरीप पिकाची सुरूवातीलाच झालेली दैना, यावरून येते. आता दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हे नैसर्गिक दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. मागील वर्षातील कोरड्या दुष्काळाची झळ सोसत शेतकरीवर्ग कसाबसा कुठल्याही आर्थिक मदतीविना सावरत खरीप हंगामाच्या तयारीला लागला. बियाणांची जुळवाजुळव करून शेतात बियाणे पेरणी केली. मृगापूर्वी बरसणारा वरूणराजा गेवरा परिसरामध्ये बरसलाच नाही. शेतकरी जून अखेरपर्यंत खरीपपूर्व तयारी करून पावसाची वाट बघत राहिला. हवामान विभागाचे अंदाज चुकवत नेहमीप्रमाणे आपल्या लहरीपणाचा परिचय देत २७ जूनपासून या परिसरात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या आणि त्याच आठवड्यात जोरदार वर्षावृष्टी होवून शेतकऱ्यांनी जमवाजमव करून पेरलेली बियाणे अती पाण्याने खराब झाली. भरपूर पावसाच्या तडाख्यात आठवडाभर संपूर्ण भातपिकाच्या बांद्या तुडुंब भरून राहिल्या. संपुर्ण आठवडाभर संततधार बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडवून टाकले आहे. आता बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक कंपन्यांकडून बाजारपेठेतील खरेदी केलेली बियाणे उगवण झाली नसल्यानेही काही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)