शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:03 IST

‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या

अतिवृष्टीचा फटका : आठवडाभर पाण्यात राहून बियाणे सडले गेवरा : ‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ आणि चालू खरीप पिकाची सुरूवातीलाच झालेली दैना, यावरून येते. आता दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हे नैसर्गिक दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. मागील वर्षातील कोरड्या दुष्काळाची झळ सोसत शेतकरीवर्ग कसाबसा कुठल्याही आर्थिक मदतीविना सावरत खरीप हंगामाच्या तयारीला लागला. बियाणांची जुळवाजुळव करून शेतात बियाणे पेरणी केली. मृगापूर्वी बरसणारा वरूणराजा गेवरा परिसरामध्ये बरसलाच नाही. शेतकरी जून अखेरपर्यंत खरीपपूर्व तयारी करून पावसाची वाट बघत राहिला. हवामान विभागाचे अंदाज चुकवत नेहमीप्रमाणे आपल्या लहरीपणाचा परिचय देत २७ जूनपासून या परिसरात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या आणि त्याच आठवड्यात जोरदार वर्षावृष्टी होवून शेतकऱ्यांनी जमवाजमव करून पेरलेली बियाणे अती पाण्याने खराब झाली. भरपूर पावसाच्या तडाख्यात आठवडाभर संपूर्ण भातपिकाच्या बांद्या तुडुंब भरून राहिल्या. संपुर्ण आठवडाभर संततधार बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडवून टाकले आहे. आता बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक कंपन्यांकडून बाजारपेठेतील खरेदी केलेली बियाणे उगवण झाली नसल्यानेही काही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)