शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कंत्राटी पद्धतीमुळे नहराच्या पाणी वाटपात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:35 IST

घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे.

ठळक मुद्देघोडाझरी कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पाणसारा वसुलीवर परिणाम

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांना पाणी न मिळाल्याने धान पीक करपायला लागले आहे.घोडाझरी तलाव शंभर टक्के भरला, तरी सुद्धा कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप सुरु आहे. कंत्राटदार पाण्याचे वाटप करण्यासाठी रोजीने मजूर लावतो. ज्या शेतकºयांचे घोडाझरी सिंचन शाखेशी पाणी मिळण्यासाठी करारपत्र केलेले आहे, अशा सर्व शेतकºयांना धान शेतीला पाणी मिळायला पाहिजे. परंतु कंत्राटदाराची माणसे जे अतिक्रमणधारक आहेत किंवा ज्या शेतकºयांनी करार केले नाही, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन पाणी देतात. त्यामुळे खºया शेतकºयांना घोडाझरीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.घोडाझरी तलावापासून कालव्याच्या सहाय्याने पाणी आणण्याची जबाबदारी सिंचन विभागाच्या अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर आहेत. मात्र यावर्षी विविध कारण पुढे करीत अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे पाणी गडबोरी कालव्याला पोहचले नाही. पाणी जास्त आणल्यास कालवा फूटणार तर काही ना ही भीती अधिकारी वर्गात होती. कारण गतवर्षी कालवा कच्चेपार व त्याच्या समोरील भागामध्ये फूटत होता. त्यामुळे पाणी वाहून जायचे. शिवाय आठ-दहा दिवस बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी वाटप बंद असायचे.सदर कालवा दरवर्षी फूटत असल्याने शासनाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी व सिमेंट लायसिंगचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु, सिमेंट लायनिंगचे काम करताना दोन-अडीच इंच थर मुरुम टाकून त्यावरच काम करण्यात आले. सिमेंटला पकड मजबूत नसल्याने आणि घराला करतात तसे प्लॉस्टर करण्यात आल्याने पहिल्याच वर्षी बºयाच ठिकाणी पाण्याबरोबर प्लॉस्टर वाहून गेले तर बºयाच ठिकाणी पाण्याअभावी पक्के न झाल्याने प्लॉस्टर उखडले आहे व भेगाही गेल्या आहेत. त्यामुळे नवरगाव-गडबोरीकडे येणाºया कालव्याची दैनावस्था आहे.पूर्वी याच कालव्यावर दरवर्षी मुरुम कालव्याच्या दोन्ही भागावर पसरवल्या जात होता. आता घोडाझरी सिंचन शाखेला परवडते की नाही, मात्र बºयाच वर्षापासून त्यावर मुरुमही टाकल्या गेले नाही. त्यामुळे बºयाच भागात कालव्याची उंचीच कमी झाल्याने या कालव्याच्या माध्यमातून जास्त पाणी आणणे धोकादायक ठरत आहे. कालव्याच्या जवळ असलेल्या शेतकºयांना दोन-तीन वेळा पाणी मिळते. परंतु ज्या-ज्या ठिकाणी उपवितरीका आहेत, त्या दोन-चार किमी लांब आहेत. अशा ठिकाणी दोन महिने कालव्याने पाणी येत असले तरी शेवटच्या टोकावर पाणीच पोहचत नाही.दरवर्षीच्या या त्रासाला कंटाळून जे मोठे शेतकरी आहेत, अशा शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये बोरवेल मारले. ते संबंधीत विभागाकडे तक्रार करण्यास येत नाहीत. शेवटच्या शेतकºयाने मेहनत करुन पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास काही मधले शेतकरी पाणी जवळ आल्यास आडवे होऊन पाणी अडवतात. त्यामुळे शेवटचे शेतकरी पाणसारा देतात. परंतु झगडा-भांडण नको असे म्हणत शांत राहतात. पूर्वी सर्वच शेतकºयांना पाण्याची गरज पडत असल्याने पाच- पन्नास शेतकरी एकत्र होऊन संबंधीत कार्यालयात येऊन अधिकाºयांना पाण्याचा गेज वाढविण्यास बाध्य करीत होते. मात्र अलीकडे शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.