शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी पद्धतीमुळे नहराच्या पाणी वाटपात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:35 IST

घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे.

ठळक मुद्देघोडाझरी कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पाणसारा वसुलीवर परिणाम

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांना पाणी न मिळाल्याने धान पीक करपायला लागले आहे.घोडाझरी तलाव शंभर टक्के भरला, तरी सुद्धा कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप सुरु आहे. कंत्राटदार पाण्याचे वाटप करण्यासाठी रोजीने मजूर लावतो. ज्या शेतकºयांचे घोडाझरी सिंचन शाखेशी पाणी मिळण्यासाठी करारपत्र केलेले आहे, अशा सर्व शेतकºयांना धान शेतीला पाणी मिळायला पाहिजे. परंतु कंत्राटदाराची माणसे जे अतिक्रमणधारक आहेत किंवा ज्या शेतकºयांनी करार केले नाही, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन पाणी देतात. त्यामुळे खºया शेतकºयांना घोडाझरीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.घोडाझरी तलावापासून कालव्याच्या सहाय्याने पाणी आणण्याची जबाबदारी सिंचन विभागाच्या अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर आहेत. मात्र यावर्षी विविध कारण पुढे करीत अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे पाणी गडबोरी कालव्याला पोहचले नाही. पाणी जास्त आणल्यास कालवा फूटणार तर काही ना ही भीती अधिकारी वर्गात होती. कारण गतवर्षी कालवा कच्चेपार व त्याच्या समोरील भागामध्ये फूटत होता. त्यामुळे पाणी वाहून जायचे. शिवाय आठ-दहा दिवस बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी वाटप बंद असायचे.सदर कालवा दरवर्षी फूटत असल्याने शासनाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी व सिमेंट लायसिंगचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु, सिमेंट लायनिंगचे काम करताना दोन-अडीच इंच थर मुरुम टाकून त्यावरच काम करण्यात आले. सिमेंटला पकड मजबूत नसल्याने आणि घराला करतात तसे प्लॉस्टर करण्यात आल्याने पहिल्याच वर्षी बºयाच ठिकाणी पाण्याबरोबर प्लॉस्टर वाहून गेले तर बºयाच ठिकाणी पाण्याअभावी पक्के न झाल्याने प्लॉस्टर उखडले आहे व भेगाही गेल्या आहेत. त्यामुळे नवरगाव-गडबोरीकडे येणाºया कालव्याची दैनावस्था आहे.पूर्वी याच कालव्यावर दरवर्षी मुरुम कालव्याच्या दोन्ही भागावर पसरवल्या जात होता. आता घोडाझरी सिंचन शाखेला परवडते की नाही, मात्र बºयाच वर्षापासून त्यावर मुरुमही टाकल्या गेले नाही. त्यामुळे बºयाच भागात कालव्याची उंचीच कमी झाल्याने या कालव्याच्या माध्यमातून जास्त पाणी आणणे धोकादायक ठरत आहे. कालव्याच्या जवळ असलेल्या शेतकºयांना दोन-तीन वेळा पाणी मिळते. परंतु ज्या-ज्या ठिकाणी उपवितरीका आहेत, त्या दोन-चार किमी लांब आहेत. अशा ठिकाणी दोन महिने कालव्याने पाणी येत असले तरी शेवटच्या टोकावर पाणीच पोहचत नाही.दरवर्षीच्या या त्रासाला कंटाळून जे मोठे शेतकरी आहेत, अशा शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये बोरवेल मारले. ते संबंधीत विभागाकडे तक्रार करण्यास येत नाहीत. शेवटच्या शेतकºयाने मेहनत करुन पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास काही मधले शेतकरी पाणी जवळ आल्यास आडवे होऊन पाणी अडवतात. त्यामुळे शेवटचे शेतकरी पाणसारा देतात. परंतु झगडा-भांडण नको असे म्हणत शांत राहतात. पूर्वी सर्वच शेतकºयांना पाण्याची गरज पडत असल्याने पाच- पन्नास शेतकरी एकत्र होऊन संबंधीत कार्यालयात येऊन अधिकाºयांना पाण्याचा गेज वाढविण्यास बाध्य करीत होते. मात्र अलीकडे शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.