शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कंत्राटी पद्धतीमुळे नहराच्या पाणी वाटपात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:35 IST

घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे.

ठळक मुद्देघोडाझरी कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पाणसारा वसुलीवर परिणाम

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांना पाणी न मिळाल्याने धान पीक करपायला लागले आहे.घोडाझरी तलाव शंभर टक्के भरला, तरी सुद्धा कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप सुरु आहे. कंत्राटदार पाण्याचे वाटप करण्यासाठी रोजीने मजूर लावतो. ज्या शेतकºयांचे घोडाझरी सिंचन शाखेशी पाणी मिळण्यासाठी करारपत्र केलेले आहे, अशा सर्व शेतकºयांना धान शेतीला पाणी मिळायला पाहिजे. परंतु कंत्राटदाराची माणसे जे अतिक्रमणधारक आहेत किंवा ज्या शेतकºयांनी करार केले नाही, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन पाणी देतात. त्यामुळे खºया शेतकºयांना घोडाझरीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.घोडाझरी तलावापासून कालव्याच्या सहाय्याने पाणी आणण्याची जबाबदारी सिंचन विभागाच्या अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर आहेत. मात्र यावर्षी विविध कारण पुढे करीत अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे पाणी गडबोरी कालव्याला पोहचले नाही. पाणी जास्त आणल्यास कालवा फूटणार तर काही ना ही भीती अधिकारी वर्गात होती. कारण गतवर्षी कालवा कच्चेपार व त्याच्या समोरील भागामध्ये फूटत होता. त्यामुळे पाणी वाहून जायचे. शिवाय आठ-दहा दिवस बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी वाटप बंद असायचे.सदर कालवा दरवर्षी फूटत असल्याने शासनाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी व सिमेंट लायसिंगचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु, सिमेंट लायनिंगचे काम करताना दोन-अडीच इंच थर मुरुम टाकून त्यावरच काम करण्यात आले. सिमेंटला पकड मजबूत नसल्याने आणि घराला करतात तसे प्लॉस्टर करण्यात आल्याने पहिल्याच वर्षी बºयाच ठिकाणी पाण्याबरोबर प्लॉस्टर वाहून गेले तर बºयाच ठिकाणी पाण्याअभावी पक्के न झाल्याने प्लॉस्टर उखडले आहे व भेगाही गेल्या आहेत. त्यामुळे नवरगाव-गडबोरीकडे येणाºया कालव्याची दैनावस्था आहे.पूर्वी याच कालव्यावर दरवर्षी मुरुम कालव्याच्या दोन्ही भागावर पसरवल्या जात होता. आता घोडाझरी सिंचन शाखेला परवडते की नाही, मात्र बºयाच वर्षापासून त्यावर मुरुमही टाकल्या गेले नाही. त्यामुळे बºयाच भागात कालव्याची उंचीच कमी झाल्याने या कालव्याच्या माध्यमातून जास्त पाणी आणणे धोकादायक ठरत आहे. कालव्याच्या जवळ असलेल्या शेतकºयांना दोन-तीन वेळा पाणी मिळते. परंतु ज्या-ज्या ठिकाणी उपवितरीका आहेत, त्या दोन-चार किमी लांब आहेत. अशा ठिकाणी दोन महिने कालव्याने पाणी येत असले तरी शेवटच्या टोकावर पाणीच पोहचत नाही.दरवर्षीच्या या त्रासाला कंटाळून जे मोठे शेतकरी आहेत, अशा शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये बोरवेल मारले. ते संबंधीत विभागाकडे तक्रार करण्यास येत नाहीत. शेवटच्या शेतकºयाने मेहनत करुन पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास काही मधले शेतकरी पाणी जवळ आल्यास आडवे होऊन पाणी अडवतात. त्यामुळे शेवटचे शेतकरी पाणसारा देतात. परंतु झगडा-भांडण नको असे म्हणत शांत राहतात. पूर्वी सर्वच शेतकºयांना पाण्याची गरज पडत असल्याने पाच- पन्नास शेतकरी एकत्र होऊन संबंधीत कार्यालयात येऊन अधिकाºयांना पाण्याचा गेज वाढविण्यास बाध्य करीत होते. मात्र अलीकडे शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.