शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

बांधकामामुळे पुरातन विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:27 IST

येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.शंकरपूर ते भिसी, जामगाव, गदगाव, चिमूर, मासळ, पिपर्डा, मार्गे पेठगावापर्यंत जाणारा हा मार्ग ताडोबा अभयारण्याला अगदी लागून आहे. शंकरपूर ते भिसी, गडपिपरी या गावाजवळ एक पुरातन विहीर असून ३५ ते ४० पायऱ्या आहेत. ही पायऱ्यांची विहीर नावाने ओळखल्या जाते. या विहिरीचे बांधकाम ३५० ते ४०० वर्षांपूर्वी झाल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांचे म्हणणे आहे. भिसी येथील पुरातन भोसलेकालीन शिवमंदीरसुध्दा याच काळातील आहे. मंदिर व पायºयांच्या विहिरीचे बांधकाम एकसारखे आहे. बांधकामात वापरलेले दगड सारखेच असून वास्तू एकसारखी आहे. परिसरात अशा पध्दतीच्या पायºयांच्या विहिरी तीन ठिकाणी आहेत. आंबाई- निंबाई, लिंगोबा देवस्थान व गडपिपरी गावाजवळची एक अशा एकूण तीन विहिरी अजूनही अस्तित्व राखून आहेत. पुरातत्त्व विभागाचे या पुरातन वास्तुंकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. सन २००६ -०७ मध्ये गडपिपरी गावासाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत १८ लांखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतील विहीर पायऱ्यांच्या विहिरीपासून अगदी लागून बांधण्यात आली.त्यावेळी भिसी येथील काही पुरातत्त्वप्रेमींनी त्या बांधकामाचा विरोध केला होता. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराने चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतले. शंकरपूर ते पेठगाव या राज्य मार्गाची रूंदी १० मीटर असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बांधकाम करण्यात येणाऱ्या बाजुलाच ही विहीर आहे. युनिटी हायब्रीड नावाच्या या राज्य मार्गाला अधिक जागा लागत असल्याने ऐतिहासिक विहीर नष्ट करण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या विहिरीचे संवर्धन करून ऐतिहासिकेतचा अभ्यास केल्यास नवीन इतिहास पुढे येऊ शकतो.पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी विशेष निधीची तरतूद असते. पायऱ्यांच्या विहिरींचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार सुरू केला आहे.- युवराज मुरस्कर, अध्यक्ष ट्री फाऊंडेशन, चिमूरपायºयांच्या विहिरीपासून रस्त्याची रुंदी कमी केल्या जाईल. पुरातन वास्तूला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल.- समीर उपगंडलावर, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिमूर