शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

बांधकामामुळे पुरातन विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:27 IST

येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.शंकरपूर ते भिसी, जामगाव, गदगाव, चिमूर, मासळ, पिपर्डा, मार्गे पेठगावापर्यंत जाणारा हा मार्ग ताडोबा अभयारण्याला अगदी लागून आहे. शंकरपूर ते भिसी, गडपिपरी या गावाजवळ एक पुरातन विहीर असून ३५ ते ४० पायऱ्या आहेत. ही पायऱ्यांची विहीर नावाने ओळखल्या जाते. या विहिरीचे बांधकाम ३५० ते ४०० वर्षांपूर्वी झाल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांचे म्हणणे आहे. भिसी येथील पुरातन भोसलेकालीन शिवमंदीरसुध्दा याच काळातील आहे. मंदिर व पायºयांच्या विहिरीचे बांधकाम एकसारखे आहे. बांधकामात वापरलेले दगड सारखेच असून वास्तू एकसारखी आहे. परिसरात अशा पध्दतीच्या पायºयांच्या विहिरी तीन ठिकाणी आहेत. आंबाई- निंबाई, लिंगोबा देवस्थान व गडपिपरी गावाजवळची एक अशा एकूण तीन विहिरी अजूनही अस्तित्व राखून आहेत. पुरातत्त्व विभागाचे या पुरातन वास्तुंकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. सन २००६ -०७ मध्ये गडपिपरी गावासाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत १८ लांखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतील विहीर पायऱ्यांच्या विहिरीपासून अगदी लागून बांधण्यात आली.त्यावेळी भिसी येथील काही पुरातत्त्वप्रेमींनी त्या बांधकामाचा विरोध केला होता. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराने चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतले. शंकरपूर ते पेठगाव या राज्य मार्गाची रूंदी १० मीटर असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बांधकाम करण्यात येणाऱ्या बाजुलाच ही विहीर आहे. युनिटी हायब्रीड नावाच्या या राज्य मार्गाला अधिक जागा लागत असल्याने ऐतिहासिक विहीर नष्ट करण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या विहिरीचे संवर्धन करून ऐतिहासिकेतचा अभ्यास केल्यास नवीन इतिहास पुढे येऊ शकतो.पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी विशेष निधीची तरतूद असते. पायऱ्यांच्या विहिरींचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार सुरू केला आहे.- युवराज मुरस्कर, अध्यक्ष ट्री फाऊंडेशन, चिमूरपायºयांच्या विहिरीपासून रस्त्याची रुंदी कमी केल्या जाईल. पुरातन वास्तूला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल.- समीर उपगंडलावर, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिमूर