शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे बाजारपेठ पडली ओस

By admin | Updated: July 27, 2016 01:08 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०३ अडते...

लाखोंचा व्यवहार ठप्प : भाजीपाला महागला, फळांचेही भाव वधारले चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०३ अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला. त्यामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजीबाजारात शुकशुकाट होता. अडते व व्यापाऱ्यांच्या संपामुळे फळे व भाजीविक्रीच्या माध्यमातून चंद्रपुरात एक दिवसात होणारी ४० ते ५० लाखांची उलाढाल थांबली आहे. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बाजार समिती प्रशासनाने अडते-व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला. मंगळवारी सकाळपासूनच बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. तर गंज वॉर्डातील भाजी बाजारातही कोणताही भाजीविक्रेता दिसून आला नाही. त्यामुळे भाजीपाला व फळांचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे अध्यक्ष दिनेश चोखारे व सचिव संजय पावडे यांनी व्यापारी व अडत्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) भाजीविक्रेते देवदर्शनाला अडते व व्यापाऱ्यांचा संप आधीपासूनच ठरलेला होता. त्यामुळे गंज वॉर्डात भाजीविक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी संप काळात देवदर्शन करून येण्याची योजना आखली. सोमवारी सायंकाळी संपाबाबत त्यांना विचारणा केली असता, संप काळात मार्केट बंद राहणार असल्याने या काळात देवदर्शन व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचे अनेक भाजीविक्रेत्यांनी एकत्र जाण्याचे ठरविल्याचे सांगितले. यासाठी सुरू आहे संप व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा नवीन अध्यादेश राज्य शासनाने काही दिवसांपुर्वीच काढला. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला मिळाले आहे. नवीन अध्यादेशानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे.