शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

सरकारी खरेदीच्या गोंधळात व्यापाऱ्यांचे चांगभले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:08 IST

शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी यंदा सरकारी खरेदी केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीची सक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देक्लिष्ट निकषांमुळे शेतकरी वैतागले : आॅनलाईन नोंदणीवर अघोषित बहिष्कार, कृषी धोरणात बदल करण्याची गरज

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकºयांना हमीभाव मिळावा, यासाठी यंदा सरकारी खरेदी केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीची सक्ती करण्यात आली. शिवाय, आर्द्रतेची टक्केवारी वाढविल्याने शेतकºयांमध्ये मोठा संभ्रम आहे. परिणामी, सरकारी खरेदी केंद्रांमध्ये २३ दिवसांत १ टक्केही शेतमालाची खरेदी झाली नाही. सरकारी खरेदीचा गोंधळ सुरू संपत नसल्याचे पाहून दलाल व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीचा गैरफ ायदा घेत आहेत. सोयाबीन पिकविणाऱ्या सर्वच तालुक्यातील उच्च प्रतीच्या शेतमालाचे दर पाडून स्वत:चे चांगले करत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील १५ तालूक्यांत यंदा सोयाबीन व कपासीचा पेरा वाढला. धान उत्पादक तालुक्यातील बºयाच शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून यावर्षी सोयाबीन लागवड केली. परंतु लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. शेंगा लगडण्याच्या कालावधीतच पुरसा पाऊस न आल्याने उत्पादनात घट होणार, हे शेतकऱ्यांच्या पुरते लक्षात आले होते. सद्य:स्थितीत सुमारे ८५ टक्के शेतकºयांनी सोयाबीनची मळणी केली असून शेतमाल विक्रीच्या तयारीत आहेत. दरम्यान, केंद्र शासनाने एफ एक्यू प्रतिचे सोयाबीन, मूग, उडीद आणि कापसाचे किमान आधारभूत दर जाहीर केली. खरेदीची जबाबदारी पणन महासंघ तसेच कापूस उत्पादक पणन महासंघाकडे सोपवली. त्याकरिता आॅनलाईन नोंदणीचा निर्णय घेतला. ही नोंदणी करण्यासाठी पीक पेरा, सात-बारा उतारा, आधार कॉर्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी कागदपत्रे अनिवार्य ठरविण्यात आले. चहूबाजूने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांनी या कागदपत्रांसाठी धावाधाव सुरू केली. मात्र, आॅनलाईन सात-बाऱ्यात पीक पेरा नोंदणी करता येत नाही, अशी कारणे पुढे करून काही तलाठ्यांनी शेतकऱ्याची अडवणूक केली. कष्ठाने पिकविलेला शेतमाल हातात येण्यापूर्वीच विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करणे म्हणजे डोकेदुखी होय, ही मानसिकता तयार झाली. या मानसिकतेमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केेंद्रातील आॅनलाईन नोंदणीवर अघोषित बहिष्कार टाकला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. पण, २३ दिवस पूर्ण होऊनही शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संबंधित अधिकारीदेखील हैराण झाले आहेत. प्रत्येक तालुक्यात दौरे करून शेतकऱ्यांचे समुपदेशन केल्या जात आहे. वरोरा, गडचांदूर केंद्राअंतर्गत येणाºया शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतमाल विक्रीसाठी विनवणी करत आहेत. तर व्यापारी विविध आमीष दाखवून शेतकºयांना सरकारी खरेदी केंद्रांपासून प्रवृत्त करत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या संबंधित विभागांनी गावखेड्यांत दौरे करून नोंदणीकरिता मार्गदर्शन केले नाही, तर यंदा सरकारी खरेदी केंद्रांचे उद्दिष्ठ पूर्ण होण्यास अडचणी येऊ शकतात.धान खरेदी केंद्रांतही ‘नो रिपॉन्स’ब्रह्मपुरी येथील सहकारी खरेदी विक्री केंद्रात ५५ धान उत्पादक शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. या केंद्राने सुमारे २०० ते ३०० क्विंटल धानाची खरेदी झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, विविध कार्यकारी सहकारी संस्था सावली, व्याहाड खुर्द, सहकारी खरेदी-विक्री संस्था सिंदेवाही, नवरगाव, कोर्धा, नागभिड, जिल्हा कृषी औद्योगिक संघ ब्रह्मपुरी, बरडकिनी, मेंडकी येथील केंद्रांमध्ये आॅनलाईन नोंदणी झाली नाही. पण, गावखेड्यांत जागृती सुरू असल्याने नोंदणीसाठी बहुसंख्य शेतकरी लवकरच केंद्रांवर येतील, असा आशावाद संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.चलन टंचाईवरुन शेतकऱ्यांची बोळवणशेतीसाठी पैशाची जुळवाजुळव करून मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांना आता तातडीच्या गरजा भागविण्यासाठी रक्कमेची गरज आहे. तालुकास्थळ अथवा नजिकच्या बाजारपेठातील व्यापाऱ्याकडून कर्ज मागून काही अल्पभूधारक शेतकरी कौटुंबीक गरजा पूर्ण करतात. काही दिवसानंतर शेतमालाच्या स्वरुपात या रक्कमेची परतफ ेडही केली जाते. मात्र, नोटाबंदीमुळे चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे करून काही व्यापाºयांनी सोयाबीन व धानाचे भाव पाडले. खरेदी होत असलेल्या शेतमाल नॉन एफ एक्यू प्रतिचा आहे, असे व्यापारी दबक्या सुरात सांगतात. पण, प्रत्यक्षात हा शेतमाल उच्च प्रतिचा असून नाईलाजास्तव अल्प दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शेतीनिष्ठ अधिकाऱ्यांची धडपडशेतमाल विक्री करण्यासाठी सरकारने आॅनलाईन नोंदणीची सक्ती केल्याने गावखेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. ही पद्धत प्रथमच यंदा प्रथमच लागू करण्यात आली. त्यामुळे सुशिक्षित शेतकऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या योजनेचे फ यदे समजावून सांगत असून नोंदणी करून घेण्यास प्रोत्साहन देत आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. डब्लू. हजारे यांनी सर्व तालुक्यांत दौरे करून आॅनलाईनची माहिती देणे सुरू केले. खासगी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याऐवजी हमीभावाचा लाभ घ्या, ही भूमिका मांडत आहेत. पण, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, हे प्राप्त झालेल्या नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे.आर्द्रतेची जाचक अट शिथिल करापिके उभी असताना परतीचा पाऊस आला. त्यामुळे पिकांत ओलावा कायम आहे. त्यातच थंडी सुरू झाल्याने सोयाबीनमध्ये सुमारे १४ ते २० टक्के आर्द्रता आहे. केंद्र शासनाने घोषित केलेल्या हमीभावानुसार सोयाबीनमध्ये १२ टक्के आर्द्रतेची अट लागू केली. यंदाचे बदलते हवामान, पावसाची स्थिती आदी घटकांचा विचार करून १२ टक्के आर्द्रतेचा निकष शिथिल केल्यास सरकारी केंद्रात शेतमाल विकणाºयांची संख्या वाढू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तीन केंद्रांवर ५१ शेतकऱ्यांची नोंदणीदि महाराष्ट्र स्टेट को- आॅपरेटिव्ह मार्केटिंग फे डरेशनअंतर्गत गडचांदूर, वरोरा, चंद्रपूर व राजूरा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शनिवारपर्यंत केवळ ५१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये गडचांदूर २६, वरोरा २२ आणि चंद्रपूर केंद्रातील ३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतमाल आणण्यासंदर्भात मोबाईलवर संदेश पाठविला जातो.