शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:52 IST

मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

ठळक मुद्दे५४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी सज्ज : पेरणीची वेळ गेल्यास मोठा फटका

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. सुमारे ५४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झाले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही गावामध्ये पावसाने हजेरी दिली. मात्र, तेव्हापासून पत्ता नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे चित्र पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. तर दुसरीकडे ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्राने पाठ फिरविली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने कापूस, सोयाबीनप्रमाणे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन होते. कापूस लागवडीला उशीर झाल्यास उत्पादन घटते, असा अनुभव शेतकरी सांगतात. हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.चिमूर, खडसंगी, शंकरपूर, भिशी, नेरी परिसरात शेतीच्या मशागतीची कामे झाली. नांगरणी, वखरणी, पºहाट्या वेचणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. पण जमीन तापून असल्याने दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. मागील वर्षी धानाचे मोठे नुकसान झाले. शेकडो शेतकºयांना कर्जाचा भरणा करता आला नाही. यंदा हिच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे जगणे कठीण होईल, असे चित्र दिसून येत आहे.शेतकरी हवालदिलयावर्षी पाऊस मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्र संपत आल्या नंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता चिमूर, भिशी, शंकरपूर, जांमभूळघाट, आमडी, रेंगाबोडी, बोथली, वाहानगाव, नेरी, मोटेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊस येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्यापही हुलकावणीच देत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस