शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:52 IST

मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

ठळक मुद्दे५४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी सज्ज : पेरणीची वेळ गेल्यास मोठा फटका

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. सुमारे ५४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झाले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही गावामध्ये पावसाने हजेरी दिली. मात्र, तेव्हापासून पत्ता नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे चित्र पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. तर दुसरीकडे ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्राने पाठ फिरविली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने कापूस, सोयाबीनप्रमाणे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन होते. कापूस लागवडीला उशीर झाल्यास उत्पादन घटते, असा अनुभव शेतकरी सांगतात. हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.चिमूर, खडसंगी, शंकरपूर, भिशी, नेरी परिसरात शेतीच्या मशागतीची कामे झाली. नांगरणी, वखरणी, पºहाट्या वेचणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. पण जमीन तापून असल्याने दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. मागील वर्षी धानाचे मोठे नुकसान झाले. शेकडो शेतकºयांना कर्जाचा भरणा करता आला नाही. यंदा हिच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे जगणे कठीण होईल, असे चित्र दिसून येत आहे.शेतकरी हवालदिलयावर्षी पाऊस मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्र संपत आल्या नंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता चिमूर, भिशी, शंकरपूर, जांमभूळघाट, आमडी, रेंगाबोडी, बोथली, वाहानगाव, नेरी, मोटेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊस येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्यापही हुलकावणीच देत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस