शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पावसाअभावी उभे पिके करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST

पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाची छाया : शेतकºयांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या कडक उन्ह तापत असल्याने उगवलेले पीक करपन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.जून महिन्यात पावसाची सुरूवात तशी चांगलीच झाली. यावेळी शेतकºयांनी कशाचीही पर्वा न करता वेळेवर पेरण्या केल्या. जमिनीतून पीक उगवले, पण पावसाने नंतर जी दडी मारली, ती उभ्या पिकांचा बळी घेतल्यानंतरच येईल, असेच चिन्ह दिसून येत आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसरात कापसाचे पीक एवढे बहरून आले आहे की, ते बघितल्यानंतर येणारी दिवाळी शेतकºयांसाठी चांगली जाईल, असे दिसून येते. मात्र दडी मारलेल्या पावसाने बळीराजा चिंतातूर झाला आहे.धान पºहे करपली, शेतकºयांची धडधड वाढलीतळोधी (बा) : अपुºया पावसामुळे रोवणीचे कामे पूर्णपणे खोळंबली असून धान पºहे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तळोधी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते बल्लू गेटकर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धान पिकावर अवलंबून असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या भागातील घोडाझरी तलावात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा असून नदी-नाले, बोड्या सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही शेतकºयांनी विहीर, बोरवेलच्या पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र रोवणीचे पीक करपून गेले आहे.उन्हाचा तडाखाराजुरा : बºयाच दिवसापासून पावसाने दडी मारली असून सूर्यनारायण मात्र तापत आहे. त्यामुळे शेतातील ओलावा सुकून गेला आहे. शेतातील कापूस व सोयाबीनचे रोपे कोमेजून जात असून ओलिताची सोय नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. महागडे बी-बियाणे व खत खरेदी करून पेरणी केली. पावसाने सुरवातीस योग्य साथ दिली. शेतकºयांनी मशागत करून रोपाची वाढ केली. परंतु, अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे ओलावा सुकुन गेला असून आता पाऊस आवश्यक आहे.