शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

डी.टी.एड पदवीधारक लागले शेतीच्या कामाला

By admin | Updated: August 25, 2014 23:55 IST

शिक्षक बनण्याच्या ध्यास घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएड्चे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने बेरोजगार झालेले डीटीएड्धारक शेतीच्या कामाला लागले आहेत.

कोरपना : शिक्षक बनण्याच्या ध्यास घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएड्चे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने बेरोजगार झालेले डीटीएड्धारक शेतीच्या कामाला लागले आहेत. डीटीएड् धारकांना शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा डीटीएड्कडे कल कमी झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांअभावी अनेक अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. परिणामी सुरू असलेली अध्यापक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी शिक्षकाची हमखास नोकरी म्हणून डीटीएड्कडे पाहिले जात असे. १९७० ते १९८५ च्या काळात अध्यापनशास्त्राची पदविका घेतल्यानंतर हमखास शिक्षकाची नोकरी मिळत होती. पुढे १९९० पासून राज्य शासनाने शेकडो खासगी अध्यापक विद्यालयांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली. अध्यापक विद्यालयाची निवड करताना ३० टक्के उमेदवार व्यवस्थापन कोट्यातून निवडण्याचे अधिकार अध्यापक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले होते. यावेळी नोकरीच्या हव्यासापोटी कमी टक्केवारी असलेल्या व केंद्रीय फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांना व्यवस्थापन कोट्यातून संधी मिळत होती. उमेदवार दोन ते अडीच लाखांपर्यंत पैसे भरूने डीटीएड् पदविका पूर्ण करीत होते. यानंतर राज्य शासनाने अध्यापक विद्यालयांना मान्यता देणे सुरुच ठेवल्याने कालांतराने डिटीएड् पदविका घेतलेल्या बेरोजगारांची फौज निर्माण झाली. राज्य शासनाने राज्यात शिक्षक भरतीसाठी २००९-१० मध्ये सीईटी परीक्षा घेतली होती. त्यानंतर मागील वर्षात सीईटी घेण्यात आली. या परीक्षेसाठी आवेदन दाखल करून परीक्षा दिली. परंतु या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागला. टक्केवारीच्या अर्हतेमध्ये जिल्ह्यातील मोजकेच डीटीएड्धारक टीईटी उत्तीर्ण झालेत. संपूर्ण विदर्भाचा निकाल पाच टक्केच्या आतच होता. यामुळे डीटीएड्धारकांच्या अडचणी वाढल्या असून बेरोजगारांची फौज निर्माण होत आहे. परिणामी १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता डीटीएड्ला पाठ दाखवित आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षक पदभरतीची प्रक्रीया बंद आहे. शाळा पडताळणीमध्ये राज्यभर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तिच स्थिती जिल्हा परिषदेची असून जिकडे तिकडे समायोजन प्रक्रिया होत आहे. त्यामुळे डिटीएड्धारकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच राहणार आहे. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड झालेला विद्यार्थी शेतीकामाच्या हंंगामावर रोजंदारीने मिळेल ते काम करीत आहे. अनेक डिटीएड्धारक बाहेर जिल्ह्यात कामाच्या शोधात जात आहेत. परिणामी अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने अनेक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. (शहर प्रतिनिधी)