शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात तरीही दुष्काळमुक्त!

By admin | Updated: October 24, 2015 00:39 IST

५० टक्के कमी पैसेवारी असलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

पैसेवारीचा फटका : अंतिम पैसेवारीची प्रतीक्षासिंदेवाही : ५० टक्के कमी पैसेवारी असलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्हा व सिंदेवाही तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही. तालुक्यात अल्प पावसाने तथा किडीच्या प्रादुर्भावाने दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे.मृगाच्या प्रारंभी धो-धो बरसलेल्या पावसाने नंतर चांगलीच पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अपेक्षीत पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटरपंपाच्या साहायाने तर कधी तलाव, बोड्यामधून पाणी देऊन पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. तालुक्यात १८ हजार हेक्टर जमीन धानपिकाची लागवड आहे. पाऊस वेळोवेळी दगा देत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. मागील दोन वर्षापासून तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. यावर्षी पावसाचे त्यापेक्षा कमी प्रमाण असून बोड्या, तलाव, नदी, कोरडे झाले आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व किडीच्या प्रादुर्भावाने हातातून जाण्याची शक्यता अधिक आहे. शासनाच्या कृषी विभागातर्फे अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधांचा पुरवठा अत्यल्प आहे. दुसरीकडे पैसेवारीच्या दुष्टचक्रात शासनाने शेतकऱ्यांना अडकविले आहे. तालुक्यात नजरअंदाज पैसेवारी ६० ते ७० पैसे असली तरी अंतिम आणेवारी ही ५० टक्के खाली येणे अपेक्षित असल्याने शासन याबाबत सुधारित निर्णय घेते का? याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)