शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

वाहनचालकांनो, ही जीवघेणी स्पर्धा कुणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी झालेला भीषण अपघात वाहनचालकांसाठी धडा आहे. ज्याची चूक होती आणि ज्याची चूक नव्हती अशा दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताने रस्ता सुरक्षेवरच अनेक प्रश्न लावले आहे.रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो. याची जाणीव त्या वाहनाच्या चालकाला नसेल आणि तो आपल्याच तालात वाहन हाकत असेल तर हा जीवघेणा खेळ कधीच थांबणार नाही. त्या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका प्रवाशाने जे सांगितले हे भयावह आहे. ट्रॅव्हल्सचा जामनंतरचा प्रवास थरकाप उडविणारा होता. चालक मोठमोठ्याने गाणे वाजवत होता. तो मागे वळून प्रवाशांसोबत गप्पाही मारत होता. मोबाइलवरही बोलायचा. आनंदवन चौकानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असतानाच घात झाला. लगेच ट्रक आडवा आला. यात दोन्ही चालकांचा जीव गेला. तो ट्रक नसता तर मृतांचा आकडा वाढला असता, असे तो म्हणाला. रस्त्याने शेकडो वाहने धावत असतात. एकाची चूक अनेकांना भोगावी लागते. त्याचे परिणाम दूरगामी असतात. स्वत:चा जीव नेहमी धोक्यातच असतो. हे प्रत्येक चालकाने ध्यानात ठेवण्यासारखे आहे. प्रवासी वाहनचालक असे बेजबाबदारपणे वाहन का हाकतात? याला त्या वाहनाचे मालकही तेवढेच जबाबदार आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनीच ही जीवघेणी स्पर्धा सुरू केलेली असते. पुढच्या थांब्यावरील प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा असते. यामध्ये जीव जाईल तो चालकाचा आणि प्रवाशांचा, मालक मात्र सुखरूप असतो. विम्याच्या आधारे दुसरे वाहन मिळेल, पण गेलेला जीव परत मिळत नाही. मग चालकाने का म्हणून ही जीवघेणी स्पर्धा करावी? प्रत्येक दिवस सारखा नसतो. हे या अपघातातून शिकले तर मिळविले.

ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा : खासदारचंद्रपूर :  एसटी बस दोन महिन्यांपासून बंद असल्याने अधिकचा नफा कमावण्याच्या हेतूने प्रवाशांचा जीव वाहनचालक टांगणीला लावत आहेत. जिल्ह्यातून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा, असे निर्देश देणारे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व  सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र खैरकर, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर- ब्रह्मपुरी तसेच चंद्रपूर-पुणे मार्गावर जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कार्यरत आहेत. ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपायोजना कराव्यात, अनियंत्रित वेगासाठी किती खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली याची माहिती सादर करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली.

 

टॅग्स :Accidentअपघात