शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वाहनचालकांनो, ही जीवघेणी स्पर्धा कुणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी झालेला भीषण अपघात वाहनचालकांसाठी धडा आहे. ज्याची चूक होती आणि ज्याची चूक नव्हती अशा दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताने रस्ता सुरक्षेवरच अनेक प्रश्न लावले आहे.रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो. याची जाणीव त्या वाहनाच्या चालकाला नसेल आणि तो आपल्याच तालात वाहन हाकत असेल तर हा जीवघेणा खेळ कधीच थांबणार नाही. त्या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका प्रवाशाने जे सांगितले हे भयावह आहे. ट्रॅव्हल्सचा जामनंतरचा प्रवास थरकाप उडविणारा होता. चालक मोठमोठ्याने गाणे वाजवत होता. तो मागे वळून प्रवाशांसोबत गप्पाही मारत होता. मोबाइलवरही बोलायचा. आनंदवन चौकानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असतानाच घात झाला. लगेच ट्रक आडवा आला. यात दोन्ही चालकांचा जीव गेला. तो ट्रक नसता तर मृतांचा आकडा वाढला असता, असे तो म्हणाला. रस्त्याने शेकडो वाहने धावत असतात. एकाची चूक अनेकांना भोगावी लागते. त्याचे परिणाम दूरगामी असतात. स्वत:चा जीव नेहमी धोक्यातच असतो. हे प्रत्येक चालकाने ध्यानात ठेवण्यासारखे आहे. प्रवासी वाहनचालक असे बेजबाबदारपणे वाहन का हाकतात? याला त्या वाहनाचे मालकही तेवढेच जबाबदार आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनीच ही जीवघेणी स्पर्धा सुरू केलेली असते. पुढच्या थांब्यावरील प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा असते. यामध्ये जीव जाईल तो चालकाचा आणि प्रवाशांचा, मालक मात्र सुखरूप असतो. विम्याच्या आधारे दुसरे वाहन मिळेल, पण गेलेला जीव परत मिळत नाही. मग चालकाने का म्हणून ही जीवघेणी स्पर्धा करावी? प्रत्येक दिवस सारखा नसतो. हे या अपघातातून शिकले तर मिळविले.

ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा : खासदारचंद्रपूर :  एसटी बस दोन महिन्यांपासून बंद असल्याने अधिकचा नफा कमावण्याच्या हेतूने प्रवाशांचा जीव वाहनचालक टांगणीला लावत आहेत. जिल्ह्यातून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा, असे निर्देश देणारे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व  सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र खैरकर, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर- ब्रह्मपुरी तसेच चंद्रपूर-पुणे मार्गावर जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कार्यरत आहेत. ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपायोजना कराव्यात, अनियंत्रित वेगासाठी किती खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली याची माहिती सादर करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली.

 

टॅग्स :Accidentअपघात