शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: September 17, 2015 00:52 IST

महाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे.

मंत्र्यांना मायेचा पाझर फुटलाच नाही : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद कायमशंकर चव्हाण  जिवतीमहाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे व तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी त्या गावांचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आपणाला विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याची कबुली त्यांनी दिली होती व काही महत्त्वाचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अनेक दिवस लोटूनही त्या आश्वासनांची पुर्तता झाली नसल्याने मंत्र्याना आश्वासनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न वादग्रस्त १४ गावातील नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट’ भेटीत केला.दोन्ही राज्याचे स्वामित्व चालत असलेल्या या १४ गावातील नागरिकांची फरपट सुरू आहे. विकासाचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. परमडोलीत आरोग्य उपकेंद्र आहे. पण कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तर काही पदे रिक्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल सेवा पोहोचविण्यात शासनाला यश मिळाले असले तरी या वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना दुरध्वनी सेवेचा लाभ मिळाला नाही. येथील काही गावे कोरपना ठाण्यात समाविष्ठ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक महत्त्वाच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी परमडोली गावात घेतलेल्या कार्यक्रमात दिले होते. मात्र समस्या सोडविण्याच्या हालचाली अजूच सुरू झाल्या नाहीत. परिसरातील काही गावात आजाराचे प्रमाण वाढले आहेत. दुरध्वनी सेवा गावात अजून पोहोचली नाही. दोन वेळेस महामंडळाची बस गावात येत असली तरी पक्या रस्त्यांची सोय झाली नाही.