शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे स्वप्न साकार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:04 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

ठळक मुद्दे१९ जणांना वाटप : जमीनधारकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात मोडत असून येथे कोळसा] सिमेंट, पेपरमिलचे कारखाने आहे. तसेच येथील बिटी वुड म्हणून सागवान लाकूड भरतात प्रसिद्ध आहे. या सर्व कारखानदाराचे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद या परिसरात प्रमुख वरीष्ठ स्तरावरील कार्यालय आहे. त्यामुळे त्यांना कामे करण्यासाठी विमानाने जाणे-येणे करणे सोईस्कर होते. बºयाच कारखानदारांना या जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल हवा आहे.मात्र विमानतळाअभावी ते पाठ दाखवित होते. याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेवून विमानतळाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जमिनीची शोध मोहीम सुरु केली व यात राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील जमीन उपलब्ध करुन विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. आता जमीनधारकांना प्रति एकर आठ लाख रुपयाप्रमाणे १९ पट्टे धारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली आहे. एकूण ६३ पट्टेधारक असून दररोज पाच पट्टेधारकांना रजिस्ट्री करुन रक्कम अदा केली जात आहे.या विमानतळासाठी एकूण ७२० एकर जमीन विमान तळ प्राधिकरणास देण्याचे ठरले आहे. यात खाजगी जमीन २८७ एकर, वन जमीन व्१८५ एकर व सरकारी जमीन २४७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाकरिता भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच वन जमिनीचे प्रस्ताव वन प्रबोधीनी चंद्रपूरमार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना मोबदलाबाबत भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी विमानतळ प्राधिकरणास यावर निर्णय घेण्यासाठी कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आम जनता, कारखाने धारक, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते तसेच गडचिरोली व आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियाल (तेलंगणा) या जिल्ह्यातील लोकांना विमानतळाचा लाभ घेता येणार आहे. मूर्ती हे गाव मध्यभागी असल्यामुळे प्रवास करणे सोयीचे होणार आहे. एका वर्षाच्या आत विमानतळ सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.