शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

विमानतळाचे स्वप्न साकार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:04 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

ठळक मुद्दे१९ जणांना वाटप : जमीनधारकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात मोडत असून येथे कोळसा] सिमेंट, पेपरमिलचे कारखाने आहे. तसेच येथील बिटी वुड म्हणून सागवान लाकूड भरतात प्रसिद्ध आहे. या सर्व कारखानदाराचे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद या परिसरात प्रमुख वरीष्ठ स्तरावरील कार्यालय आहे. त्यामुळे त्यांना कामे करण्यासाठी विमानाने जाणे-येणे करणे सोईस्कर होते. बºयाच कारखानदारांना या जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल हवा आहे.मात्र विमानतळाअभावी ते पाठ दाखवित होते. याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेवून विमानतळाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जमिनीची शोध मोहीम सुरु केली व यात राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील जमीन उपलब्ध करुन विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. आता जमीनधारकांना प्रति एकर आठ लाख रुपयाप्रमाणे १९ पट्टे धारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली आहे. एकूण ६३ पट्टेधारक असून दररोज पाच पट्टेधारकांना रजिस्ट्री करुन रक्कम अदा केली जात आहे.या विमानतळासाठी एकूण ७२० एकर जमीन विमान तळ प्राधिकरणास देण्याचे ठरले आहे. यात खाजगी जमीन २८७ एकर, वन जमीन व्१८५ एकर व सरकारी जमीन २४७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाकरिता भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच वन जमिनीचे प्रस्ताव वन प्रबोधीनी चंद्रपूरमार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना मोबदलाबाबत भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी विमानतळ प्राधिकरणास यावर निर्णय घेण्यासाठी कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आम जनता, कारखाने धारक, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते तसेच गडचिरोली व आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियाल (तेलंगणा) या जिल्ह्यातील लोकांना विमानतळाचा लाभ घेता येणार आहे. मूर्ती हे गाव मध्यभागी असल्यामुळे प्रवास करणे सोयीचे होणार आहे. एका वर्षाच्या आत विमानतळ सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.