शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचराळ्याच्या बंद घाटातून रेतीचा उपसा

By admin | Updated: December 20, 2014 00:56 IST

पर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील

विनायक येसेकर भद्रावतीपर्यावरण आणि वन्यप्राण्यांना बाधा पोहचू नये म्हणून वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कचराळा गावालगतच्या जंगलातील कचराळा नाल्यातील रेती उपशावर बंद घातली. याचा लिलाव होत नाही. मात्र रेती तस्कर गेल्या कित्येक दिवसांपासून या घाटातून रेतीचा उपसा करीत आहे. याबाबत वनविभाग, महसूल, पोलीस यांना सुचनासुद्धा केल्या आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. लोकमतने गुरुवारी या घाटाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा झाल्याचे दिसून आले.३० सप्टेंबरनंतर रेती घाटांवरील रेती उपसा करण्याची मुदत संपल्याने रेती तस्करांनी या नाल्याकडे नजर टाकली आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने त्या ठिकाणावरून ट्रॅक्टरसह मोठ्या मालवाहू गाड्यांनी रेतीचे वहन केले जात आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून रात्रीच्या उपसा आणि वहनामुळे वन्यप्राण्यांना याचा त्रास होत आहे. यामुळे त्यांनीही आपला मोर्चा कचराळा आणि तिरवंजा या जंगल शेजारी असलेल्या गावाकडे वळविला आहे. काही दिवसापूर्वी तिरवंजा येथील एका वृद्धावर त्याचेच शेतात बिबट्याने हल्ला केला होता. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री जागली करीत नसल्याने रानडुक्कर उभे पीक उद्धवस्त करीत आहे. कचराळा हे गाव नाल्याला लागून असल्याने रात्रभर चालणाऱ्या ट्रॅक्टर व गाड्यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली आहे. याबाबत येथील काही नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अवैध रेती उत्खनाबाबत तहसीलदार सचिन कुमावत यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. परंतु हे काम पोलिसांचे असल्याचे सांगून त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. याची चौकशी करणे गरजेचे आहे.उच्च न्यायालयाच्या एका आदेशान्वये रात्री केली जात असलेली गौण खनिजाची चोरी पकडण्याचे काम हे पोलिसांचे असल्याचे सांगितले आहे.दिवसा होत असलेली चोरी महसूल विभागाचे कर्मचारी पकडत असतात. कचराळा येथील कुण्याही नागरिकाने आपल्याला भेटून या चोरी संदर्भात माहिती दिली नाही.- सचिन कुमावत, तहसीलदार, भद्रावतीकम्पाऊंडही उद्ध्वस्त महाऔष्णिक वीज केंद्राने रानडुकरांपासून सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी सौर उर्जेवरील विद्युत तारेच कम्पाऊंड तयार केले आहे. प्रवेशद्वारसुद्धा आहे. मात्र रेती तस्करांनी ते उद्ध्वस्त केले आहेत. गावपातळीवरील शासकीय हुद्यावर व समितीवर नेमून दिलेले पदाधिकारचीच आपल्या मालकीच्या टॅक्टरद्वारे रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची माहिती आहे.