शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

त्या पुराची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

मागील वर्षी पुरामुळे हाहाकार : शेकडो कुटुंब अजूनही स्थिरावले नाहीत रवी रणदिवे ब्रह्मपुरी : मागील वर्षी याच काळात ...

मागील वर्षी पुरामुळे हाहाकार : शेकडो कुटुंब अजूनही स्थिरावले नाहीत

रवी रणदिवे

ब्रह्मपुरी : मागील वर्षी याच काळात वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केल्याने जवळपास तालुक्यातील शंभर गावांत पुराचा सामना करावा लागला होता. यावेळी त्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत.

ब्रह्मपुरी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहत आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती ओढवावी, अशी स्थिती नाही. तरीही पुराचा सामना करावा लागतो, हे दुर्भाग्य आहे. मध्यप्रदेशात झालेल्या जास्त पावसामुळे ही झळ सोसावी लागत असते. यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे मत अनेक पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत. या काळात पाऊस समाधानकारक असला तरी पूरपरिस्थिती एवढा नाही, तरी प्रशासनाने पुराचा इशारा शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे पुन्हा नदीकाठावरील गावकरी भयभीत झाले आहेत.

पूर म्हटले की शेती, पशुधन, घर यांचे उद्‌ध्वस्त होणारे चित्र डोळ्यांसमोर येते. यामुळे नागरिकांची झोपच उडू लागते. मागील वर्षीच्या महापुरामुळे तालुक्यात चार हजार ६७१ घरांची आंशिक पडझड, ३२ झोपड्या वाहून गेल्या तर ४९० घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे आजही त्या पुराची धग मनात कायम आहे. त्या पुराने जवळपास १५ हजार हेक्टरवरील शेती वाळवंट झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. शेतकऱ्यांचे साठवलेले धान्य रस्त्यावर आणून वाळवावे लागले. बेलगाव, लाडज पूर्णतः जलमय झाले होते. साथीच्या आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. पूर ओसरल्यावरही कित्येक दिवस ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रूचा पूर कायम होता. आबालवृद्धांपासून सारेच चिंतित होते. अशातच हिरमुसल्या चेहऱ्यांनी पूरग्रस्तांचा पुन्हा गावात प्रवेश होत होता. लाडज तेथील अनेक कुटुंबांनी जि. प. शाळेतच आपले बस्तान मांडले होते. पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. गांगलवाडीतील ३३ केव्ही उपकेंद्र पाण्याखाली आल्याने काही काळ पुरासोबतच काळोख पसरला होता. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टरने ग्रामस्थ काढले जात होते. ही व यापेक्षा अनेक गंभीर दृश्ये आजही अंगावर शहारे आणतात. त्यामुळे पुन्हा नको तो पूर असेच अनेक गावकऱ्यांना वाटू लागले आहे.

बॉक्स

पुरात गोसेखुर्दचा कालवा फुटला

एकीकडे पाण्याचा महापूर तर दुसरीकडे किन्हीजवळ गोसेखुर्दचा कालवा फुटल्याने पाण्यात वाढ होऊन परिसर जलमय झाला होता. त्या गोसेखुर्द धरणाची अवस्था आजही ‘जैसे थे’ असल्याने पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आताच लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स

प्रशासनाने यावेळीही दिला इशारा

गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन यावेळी सतर्क असल्याने काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.

240721\17-54-50-chandrapur-gosikhurd.jpg

तालुक्यातील परिसर व शेती अशी जलमय झाली होती