शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

त्या पुराची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

मागील वर्षी पुरामुळे हाहाकार : शेकडो कुटुंब अजूनही स्थिरावले नाहीत रवी रणदिवे ब्रह्मपुरी : मागील वर्षी याच काळात ...

मागील वर्षी पुरामुळे हाहाकार : शेकडो कुटुंब अजूनही स्थिरावले नाहीत

रवी रणदिवे

ब्रह्मपुरी : मागील वर्षी याच काळात वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केल्याने जवळपास तालुक्यातील शंभर गावांत पुराचा सामना करावा लागला होता. यावेळी त्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत.

ब्रह्मपुरी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहत आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती ओढवावी, अशी स्थिती नाही. तरीही पुराचा सामना करावा लागतो, हे दुर्भाग्य आहे. मध्यप्रदेशात झालेल्या जास्त पावसामुळे ही झळ सोसावी लागत असते. यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे मत अनेक पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत. या काळात पाऊस समाधानकारक असला तरी पूरपरिस्थिती एवढा नाही, तरी प्रशासनाने पुराचा इशारा शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे पुन्हा नदीकाठावरील गावकरी भयभीत झाले आहेत.

पूर म्हटले की शेती, पशुधन, घर यांचे उद्‌ध्वस्त होणारे चित्र डोळ्यांसमोर येते. यामुळे नागरिकांची झोपच उडू लागते. मागील वर्षीच्या महापुरामुळे तालुक्यात चार हजार ६७१ घरांची आंशिक पडझड, ३२ झोपड्या वाहून गेल्या तर ४९० घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे आजही त्या पुराची धग मनात कायम आहे. त्या पुराने जवळपास १५ हजार हेक्टरवरील शेती वाळवंट झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. शेतकऱ्यांचे साठवलेले धान्य रस्त्यावर आणून वाळवावे लागले. बेलगाव, लाडज पूर्णतः जलमय झाले होते. साथीच्या आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. पूर ओसरल्यावरही कित्येक दिवस ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रूचा पूर कायम होता. आबालवृद्धांपासून सारेच चिंतित होते. अशातच हिरमुसल्या चेहऱ्यांनी पूरग्रस्तांचा पुन्हा गावात प्रवेश होत होता. लाडज तेथील अनेक कुटुंबांनी जि. प. शाळेतच आपले बस्तान मांडले होते. पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. गांगलवाडीतील ३३ केव्ही उपकेंद्र पाण्याखाली आल्याने काही काळ पुरासोबतच काळोख पसरला होता. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टरने ग्रामस्थ काढले जात होते. ही व यापेक्षा अनेक गंभीर दृश्ये आजही अंगावर शहारे आणतात. त्यामुळे पुन्हा नको तो पूर असेच अनेक गावकऱ्यांना वाटू लागले आहे.

बॉक्स

पुरात गोसेखुर्दचा कालवा फुटला

एकीकडे पाण्याचा महापूर तर दुसरीकडे किन्हीजवळ गोसेखुर्दचा कालवा फुटल्याने पाण्यात वाढ होऊन परिसर जलमय झाला होता. त्या गोसेखुर्द धरणाची अवस्था आजही ‘जैसे थे’ असल्याने पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आताच लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स

प्रशासनाने यावेळीही दिला इशारा

गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन यावेळी सतर्क असल्याने काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.

240721\17-54-50-chandrapur-gosikhurd.jpg

तालुक्यातील परिसर व शेती अशी जलमय झाली होती