शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. ...

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी, अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाही. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार, याची माहितीच मिळाली नाही तर कसे होणार हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.

लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?

लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार, कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५.१ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले, तर ८१.३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.

काही दिवसांनंतरच वाढतात अँटीबॉडी

कोविड लसीच्या दोन डोसांमध्ये चार ते सहा आठवड्याचे अंतर असावे, असे लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा ठरविण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिक संशोधनानंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क फोर्सनुसार कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमधील हे अंतर वाढवून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटिबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.

कोट

लसीच्या उपलब्धतेनुसार दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र केंद्र

लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्र सुरू आहेत. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातही स्वतंत्र केंद्र सज्ज ठेवण्यात आले. जादा लस मिळाल्यास ही केंद्रे कार्यान्वित होतात. २८ दिवसांतच दुसरा डोस घेणे आवश्यक नाही. ४५ ते ५६ दिवसांतही दुसरा डोस घेता येतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.

-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर.