शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. ...

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी, अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाही. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार, याची माहितीच मिळाली नाही तर कसे होणार हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.

लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?

लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार, कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५.१ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले, तर ८१.३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.

काही दिवसांनंतरच वाढतात अँटीबॉडी

कोविड लसीच्या दोन डोसांमध्ये चार ते सहा आठवड्याचे अंतर असावे, असे लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा ठरविण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिक संशोधनानंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क फोर्सनुसार कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमधील हे अंतर वाढवून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटिबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.

कोट

लसीच्या उपलब्धतेनुसार दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र केंद्र

लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्र सुरू आहेत. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातही स्वतंत्र केंद्र सज्ज ठेवण्यात आले. जादा लस मिळाल्यास ही केंद्रे कार्यान्वित होतात. २८ दिवसांतच दुसरा डोस घेणे आवश्यक नाही. ४५ ते ५६ दिवसांतही दुसरा डोस घेता येतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.

-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर.