शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

चंद्रपूर : पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता ...

चंद्रपूर : पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता पाॅलिटेक्निककडे वळत आहेत. शासकीय तंत्रनिकेतमध्ये ३९९ जागा आहेत. अर्ज मोठ्या प्रमाणात आल्यामुळे यावर्षी प्रवेश क्षमता फुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली. जिल्ह्यातील पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाची सुविधा असलेले शासकीय एक आणि खासगी ११ काॅलेज आहेत. शासकीय नोकरीच्या संधी कमी होत असल्याने तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे शिकल्यानंतर रोजगार मिळावा, यासाठी विद्यार्थी आता पाॅलिटेक्निककडे वळले आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाॅलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत आहेत. पहिल्या फेरीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत विकल्प अर्ज भरून प्रवेश निश्चित करायचा होता. त्यानंतर आता जागा वाटप होणार असून, १९ ते २३ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. दहावीचा निकाल जास्त प्रमाणात लागल्यामुळे यावर्षी पाॅलिटेक्निकसाठीही स्पर्धा निर्माण झाली आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील प्रवेश क्षमता

एकूण पाॅलिटेक्निक महाविद्यालये-१२

एकूण प्रवेशक्षमता ३,५४०

शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालये १

शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता ३९०

खासगी पाॅलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता २,७६०

बाॅक्स

सिव्हिल, संगणकाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा सिव्हिल तसेच इलेक्ट्रीकल, संगणक अभ्यासक्रमाकडे आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी या क्षेत्राकडे वळत आहेत.

कोट

प्राचार्य म्हणतात.

पाॅलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पाॅलिटेक्निककडे वाढला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षी जागा पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे.

-डाॅ. अनिल पावडे

प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी