शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

सिंचन विहिरीचे काम मग्रारोहयोमधून करा

By admin | Updated: May 23, 2014 23:45 IST

शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी

चंद्रपूर: शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योजनेंअंतर्गत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केली आहे. विदर्भात शेतकर्‍यांची स्थिती चिंताजनक असून नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे. शेतात येत्या हंगामात पेरणी ते कापणीपर्यंतची कामे करण्याकरिता हातात पैसा नाही. नापिकीमुळे मागील कर्ज फेडता न आल्याने पुढील कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय मार्ग उरला नाही. यावर उपाय म्हणून येत्या शेती हंंगामात शेतकर्‍याच्या शेतावर रोपांची पेरणी पासून ते कापणीपर्यंतची कामे हे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी स्वकमाईतून शेतात सिंचन विहिर खोदकाम केले. परंतु पैशाअभावी अपुर्ण अवस्थेत आहेत अशा शेतकर्‍यांना १.५ लाख पर्यंत मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वेळा मजूर मिळत नसल्याने शेतात पेरणी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रोहयोंतर्गत कामे केल्यास शेतकर्‍यांच्या हिताची तसेच आर्थिक मदत करणारी ठरले. असेही पाझारे यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रधान सचिव (रोहयो) व्ही. गिरीराज यांच्याकडे निवेदन दिले आहे. (नगर प्रतिनिधी)