शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सिंचन विहिरीचे काम मग्रारोहयोमधून करा

By admin | Updated: May 23, 2014 23:45 IST

शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी

चंद्रपूर: शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्‍या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योजनेंअंतर्गत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केली आहे. विदर्भात शेतकर्‍यांची स्थिती चिंताजनक असून नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे. शेतात येत्या हंगामात पेरणी ते कापणीपर्यंतची कामे करण्याकरिता हातात पैसा नाही. नापिकीमुळे मागील कर्ज फेडता न आल्याने पुढील कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय मार्ग उरला नाही. यावर उपाय म्हणून येत्या शेती हंंगामात शेतकर्‍याच्या शेतावर रोपांची पेरणी पासून ते कापणीपर्यंतची कामे हे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी स्वकमाईतून शेतात सिंचन विहिर खोदकाम केले. परंतु पैशाअभावी अपुर्ण अवस्थेत आहेत अशा शेतकर्‍यांना १.५ लाख पर्यंत मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वेळा मजूर मिळत नसल्याने शेतात पेरणी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रोहयोंतर्गत कामे केल्यास शेतकर्‍यांच्या हिताची तसेच आर्थिक मदत करणारी ठरले. असेही पाझारे यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रधान सचिव (रोहयो) व्ही. गिरीराज यांच्याकडे निवेदन दिले आहे. (नगर प्रतिनिधी)