शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बँक खाते उघडण्यास अडवणूक करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:21 IST

वयोवृद्ध निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेंतर्गत योजनांचा लाभ घेणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

ठळक मुद्देभाकपची मागणी : स्टेट बँक व्यवस्थापकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वयोवृद्ध निराधारांना श्रावण बाळ व संजय गांधी योजनेंतर्गत योजनांचा लाभ घेणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बँकेचे खाते उघडताना १ हजार रुपयांची अट लादू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (भाकप) स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मासिक ६०० रुपये शासनाकडून दिल्या जाते. या योजनांचा प्रमुख उद्देश म्हातारवयात ज्यांचे कुणीही पालन पोषण करीत नाहीत, अशा लोकांना म्हातारवयात जगण्यासाठी मदत देणे हा आहे. आजच्या काळात ६०० रुपये मध्ये एका व्यक्तीला जीवन जगणे कठीण आहे, असे असताना स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मुळझातर्फे वयोवृद्ध निराधारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार रुपये खात्यात ठेवावे तसेच नव्या खात्यासाठी तेवढ्याच रक्कमेची अट लागू केली. काही खातेधारकांना रक्कम जमा ठेवण्यासंबंधात नोटीस देण्यात आली आहे. हे केवळ चुकीचे नसून बेकायदेशीर आहे. त्यामुळे हैराण झालेल्या बोडधा, कुडेसावली, मुडझा, हळदा व बलारपूर परिसरात शेकडो निराधारानी भारतीय कम्युनिस्ट पाटीच्या नेतृत्वात सोमवारी मुडझा येथील स्टेट बँकेला भेट देऊन शाखा प्रबंधक मानापुरे यांना निवेदन दिले.निराधारांच्या लाभासोबतच शासनाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते उघडणे अनिवार्य झाले. त्यामुळे शासनाच्या अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी बँक खाते उघडले. परंतु बँकेच्या व्यवस्थापकाने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना ५०० रुपये खात्यामध्ये जमा करावयास लावले. त्यानंतर बँकेने खात्यामध्ये अपुरी रक्कम जमा आहे. इतर कारणे सांगून विद्यार्थ्यांच्या खात्यातील जमा रकमेमधून पैसे कापले, असा आरोप विनोद झोडगे यांनी केला. गरीबांची मुले शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे गणवेश घ्यायला पैसे नाहीत. शासनाकडून अनुदान दिले जात.े पण गरीबांना आपल्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी बाध्य करीत आहेत. एकीकडे शासनाकडून मिळणारा अनुदान आतापर्यंत बँक खात्यात जमाच झाला नाही. उलट बँक व्यवस्थापकाने पालकांनी खात्यामध्ये भरलेल्या ५०० रुपयांमधून वेगवेगळे चार्जेस लावून रक्कम कापून घेतली जात आहे. याकडे बँकेचे व्यवस्थापक मानापूरे यांच्या लक्षात आणून दिले. परिणामी, यापुढे वयोवृद्ध निराधारांना बँक खात्यामध्ये एक हजार रुपये जमा करण्याची सक्ती करण्यात येणार नाही. संपूर्ण पैसे काढून घेता येईल. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून कपात करणार नाही. पालकांनाही खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सक्ती होणार नाही, असे आश्वासन दिले.