शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मतदानावर प्रभाव पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:14 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहितेसंदर्भात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधाने सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या सर्व समित्यांचे प्रमुखदेखील या बैठकीला हजर होते.यावेळी प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन कशा प्रकारे करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले. एकदा आचारसंहिता अंमलात आली की अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे व नियमानुसार आपल्या अधिकाराचे वहन करणे, निवडणूक काळामध्ये अतिशय आवश्यक असून उपलब्ध असणाºया कायद्यांचे प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.निवडणूक काळामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाळणे, पदाधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणेचा वापर होऊ न देणे, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रचार साहित्याबाबत दक्षता घेणे, वाहनांचा योग्य वापर करणे तसेच या काळामध्ये राजकीय नेते व उमेदवारांपासून यंत्रणेने अलिप्त राहून काम करणे किती गरजेचे असते. हे आचारसंहितेतील नियमांचे दाखले देत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी निवडणूक काळात आचार संहितेचे पालन करताना कायम पुढे येणारे प्रश्न व त्याचे निराकरण याबाबत मार्गदर्शन केले. आजच्या बैठकीतदेखील व्हीव्हीपॅट मशीन व मतदान संयंत्राचे प्रात्यक्षिक सर्व अधिकाºयांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. मतदान पारदर्शी व निष्पक्षपणे कसे होणार, याचे प्रात्यक्षिकदेखील यावेळी दाखविण्यात आले.अधिकाऱ्यांनी सतर्क राहावेजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या अ‍ॅपवरील कोणत्याही आक्षेपाला शंभर मिनिटाच्या आत समाधानकारक उत्तर द्यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.