शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक स्थितीतही पाणी नियोजनाचा विसर

By admin | Updated: August 25, 2014 23:53 IST

मागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले

रवी जवळे - चंद्रपूरमागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले तर उर्वरित सर्व धरणातील पाण्याची स्थिती भर पावसाळ्यातच चिंताजनक आहे. नदी-नाल्यांचीही स्थिती वेगळी नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात उद्योगांचा भडीमार आहे. त्यांच्याकडून होणारा पाण्याचा उपसाही मोठा आहे. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचे आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर नसून पाण्याच्या नियोजनासंदर्भात अद्याप एकही बैठक झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे यंदा २०१०-११ चीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना, अशी भीती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. यावेळी मात्र त्याने हुलकावणी दिली.जूृन महिन्यात मृग नक्षत्रानंतर पावसाला सुरूवात होते. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १८५.९१ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी स्केवळ ३३ टक्के होती.जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के पाऊस पडला.आॅगस्ट हादेखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. एरव्ही आॅगस्ट महिन्यात जलाशये तुडूंब भरली असतात. मात्र यावेळी धरणात एकूण ५६.७२ टक्के जलसाठा आहे.पकडीगुड्डम धरण तर जवळजवळ कोरडेच पडले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इरई, उमा, शिरणा, वर्धा यासारख्या नद्यात व नाल्यांमध्येही पाण्याची पातळी ठिक नाही. बोडी-तलावांमध्येही हीच स्थिती आहे. पावसाळ्यातच पाण्याची एवढी भयावह स्थिती असताना जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासंदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होऊन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.