शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

चिंताजनक स्थितीतही पाणी नियोजनाचा विसर

By admin | Updated: August 25, 2014 23:53 IST

मागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले

रवी जवळे - चंद्रपूरमागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले तर उर्वरित सर्व धरणातील पाण्याची स्थिती भर पावसाळ्यातच चिंताजनक आहे. नदी-नाल्यांचीही स्थिती वेगळी नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात उद्योगांचा भडीमार आहे. त्यांच्याकडून होणारा पाण्याचा उपसाही मोठा आहे. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचे आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर नसून पाण्याच्या नियोजनासंदर्भात अद्याप एकही बैठक झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे यंदा २०१०-११ चीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना, अशी भीती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. यावेळी मात्र त्याने हुलकावणी दिली.जूृन महिन्यात मृग नक्षत्रानंतर पावसाला सुरूवात होते. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १८५.९१ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी स्केवळ ३३ टक्के होती.जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के पाऊस पडला.आॅगस्ट हादेखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. एरव्ही आॅगस्ट महिन्यात जलाशये तुडूंब भरली असतात. मात्र यावेळी धरणात एकूण ५६.७२ टक्के जलसाठा आहे.पकडीगुड्डम धरण तर जवळजवळ कोरडेच पडले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इरई, उमा, शिरणा, वर्धा यासारख्या नद्यात व नाल्यांमध्येही पाण्याची पातळी ठिक नाही. बोडी-तलावांमध्येही हीच स्थिती आहे. पावसाळ्यातच पाण्याची एवढी भयावह स्थिती असताना जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासंदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होऊन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.