शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या उपाययोजनात हयगय नको

By admin | Updated: May 8, 2017 00:34 IST

जिल्हयातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेणे आवश्यक ठरते.

सुधीर मुनगंटीवार : स्थानिक प्रतिनिधींना सहभाग महत्त्वाचालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हयातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेणे आवश्यक ठरते. स्थानिक प्रतिनिधींना सामान्य जनतेच्या पाणी पुरवठयासारख्या समस्येची वस्तुनिष्ठता माहिती असते. त्यामुळे आराखडा तयार करताना प्रत्यक्ष पाणी टंचाईच्या काळात निर्णय घेताना लोकप्रतिनिधींच्या मागणीचा व सूचनांचा समावेश करण्यात यावा, पाणी टंचाईच्या उपाययोजनात हयगय करू नका, अशी सूचना वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी घेतलेल्या पाणीटंचाईच्या बैठकीत केली.यावर्षी सरासरीपेक्षा २२ टक्के पर्जन्यमान अधिक झाले असल्याने जिल्हयात संभाव्य पाणी टंचाईबाबत भीषणता नाही. मात्र जिल्हयातील काही दूर्गम भागात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे अशा दूर्गम भागातील लोकप्रतिनिधींकडून सूचना आल्यानंतर प्रथम नागरिकांची तक्रार राहणार नाही, यासाठी आवश्यकता असेल तर टँकरने पाणी पुरवठा करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्हयाच्या संभाव्य पाणी टंचाईसाठी जिल्हा परिषदेने सहा कोटी २७ लाख रुपयांचा उपाय आराखडा तयार केला आहे. जिल्हयातील ४१३ टंचाईग्रस्त गावांसाठी ५७८ उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयामध्ये यावर्षी केवळ १० टँकर सुरु असून टँकरमुक्तीच्या दृष्टीने जिल्हयात पाणी पुरवठयाची व्यवस्था केली जात आहे. आमदार संजय धोटे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे यांनी केलेल्या काही सूचनांना अतिशय गंभीरतेने घेत पालकमंत्र्यांनी जिल्हयातील दूर्गम व सीमावर्ती भागात जिल्हा परिषद यंत्रणेने दुर्लक्ष करू नये, अशी तंबीही दिली. जिवती, कोरपना आदी तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या घटनांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोकरी गावाच्या पाणी पुरवठयाचा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला होता. या ठिकाणी टँकरने तात्काळ पाणी पुरवठा करावा, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व अन्य पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी आवाहन करताना स्पष्ट केले की, दरवर्षीच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाची अंमलबजावणी करताना त्यातील प्रत्येक तरतुदीची पूर्तता झाली अथवा नाही याची तपासणी करण्यात यावी. उन्हाळयात उपाययोजनासाठी होणाऱ्या बैठकांमधील प्रस्ताव पाऊस पडल्यानंतरही दुर्लक्षित होता कामा नये, केलेले नियोजन त्याच वर्षी पूर्ण करा, असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. हातपंप दुरुस्ती, नादुरुस्त नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, याबाबतचा दरवर्षीचा आकस्मिक आराखडा तयार ठेवा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.