शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी अडवणूक करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्याकरीता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करता यावा, म्हणून दूधाळू जनावरे देण्याची योजना सरकारने सुरू केली. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठक दिले.बैठकीला महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, अर्चना जिवतोडे, बँकेचे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, शेती आदी सर्वच बाबी उपलब्धही दुधाचे उत्पादन अल्प आहे. त्याकरीता दुग्ध विकास विभागाने पुढाकार घेऊन नागरिकांना गायी व म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उच्च जातीच्या गायी व म्हशी खरेदी करुन देण्यास पुढाकार घ्यावा, अशी सूचना ना. अहीर यावेळी दिली.जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कुकुटपालन व मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागांने शेतकऱ्यांशी संवाद साधावा. योग्य मार्गदर्शन करून आर्थिक प्रगती साध्य करण्यास मदत करावे, असेही त्यांनी सांगितले. आसोलामेंढा व अमलनाला प्रकल्पातील मत्स्यबीज केंद्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावे.मत्स्यव्यवसाय करणाºयांना मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावे. चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पडले आहे. त्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येवून हा प्रकल्प त्वरीत सुरु करावा, अशी सूचना महानगरपालिकेला दिली.शहरात मलनिस्सारण यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यात येवून नागरिकांना पाणी मिळेल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेत. त्या सर्व अर्जांची योग्य पडताळणी करुन सर्वांना न्याय द्यावा, असेही ना. अहीर या दृष्टीने विचार करण्यात यावा, असेही ना. अहीर यांनी सांगितले. वेंडर अ‍ॅक्ट, झरपट व इरई नदीचे सौंदर्यीकरण, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी राबविलेल्या योजनांची बैठकीत माहिती दिली.