शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निवडणुकीत पैशाचा वापर होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:23 IST

कधीकाळी निवडणुकांवर समाजातील दांडगाई करणाऱ्या अर्थात मसल पॉवरचा प्रभाव असायचा. मात्र आता कायदा सुव्यवस्था कणखरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईकरिता प्रशासनाने सज्ज असावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक एम.के. बिजू यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देएम. के. बिजू यांचे निर्देश : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी विभाग प्रमुखांकडून घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कधीकाळी निवडणुकांवर समाजातील दांडगाई करणाऱ्या अर्थात मसल पॉवरचा प्रभाव असायचा. मात्र आता कायदा सुव्यवस्था कणखरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईकरिता प्रशासनाने सज्ज असावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक एम.के. बिजू यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हा अधिकारी सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी अशोक माटकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, जिल्हा कोषागार अधिकारी डी. एम. पेंदाम, उत्पादन शुल्क विभागाचे एस. के. धोमकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सतीश खडसे, ओमप्रकाश आर्य, कार्यकारी अभियंता तथा निरीक्षकांचे संपर्क अधिकारी डी.सी. पिपरे आदी उपस्थित होते.निवडणूक खर्च निरीक्षक बिजू म्हणाले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कोणत्याही माध्यमातून पैशाचा प्रभाव टाकणाºया यंत्रणेला मोकळीक मिळता कामा नये. पैसा पुरवणे, पैशांची देवाण-घेवाण करणे, पैशांचे आमिष दाखविणे, अवैधरित्या पैशाची वाहतूक करणे किंवा अन्य कोणत्यााही कारणावरून पैशांचा वापर निवडणुकांमध्ये होऊन त्यावर प्रभाव पाडला जाईल, अशी कोणतीही कृत्ये होण्यापूर्वीच दक्ष असावे, असे निर्देश त्यांनी बिजू यांनी दिले. पोलीस दलाने मागील काही दिवसांमध्ये कोट्यवधी रूपयांची दारू जप्त केली. ही मोहीम सुरूच ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.निवडणुकीच्या यंत्रणेत कमी खर्च व्हावा तसेच मतदारांना अतिशय सुलभतेने आपला मताधिकार बजावता यावा. ग्रामीण भागातील जनतेने १९५० टोलफ्री क्रमांकाचा वापर करून मतदार यादी व मतदानाविषयीच्या अडचणी प्रशासनाकडे मांडव्या. नागरिकांकडून टोलफ्री क्रमांकाचा जिल्ह्यात चांगला वापर होत आहे, असे सांगून निवडणूक खर्च निरीक्षक बिजू यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील प्रशासकीय तयारीची माहिती दिली. विधानसभानिहाय नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी याविषयी बैठकीत माहिती सादर केली.आयकर विभागाने लक्ष द्यावेलोकसभा निवडणूकदरम्यान आयकर विभागाने आर्थिक देवाण-घेवाणीवर विशेष लक्ष ठेवावे. हे अव्यवहार संशयास्पद वाटल्यास तातडीने चौकशी सुरू करावी. सांगितले. जिल्ह्यातील सर्व बँकांनी आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर होणार नाही, याकरिता आयकर विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे निरीक्षक एम. के. बिजू म्हणाले.‘सी-व्हिजिल’ वर तीन तक्रारीवरोरा येथे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तीन तक्रारी सी- व्हिजिल अपॅवर प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन तातडीने निपटारा करण्यात आला आहे.