शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

ज्ञानसंपदेच्या बळावर करा जगाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:29 IST

जगाचे नेतृत्व कधीकाळी पेट्रोल, डिझेल व अन्य भौतिक संपन्नतेवर केले जात होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. या जगाचे नेतृत्व ज्यांच्याकडे ज्ञानसंपदा आहे, तेच करू शकतात. त्यामुळे यशाचे मार्गक्रमण करताना मेहनतीच्या बळावर ज्ञान संपन्नता मिळवून जगाचे नेतृत्व भारताला मिळवून द्या, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगाचे नेतृत्व कधीकाळी पेट्रोल, डिझेल व अन्य भौतिक संपन्नतेवर केले जात होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. या जगाचे नेतृत्व ज्यांच्याकडे ज्ञानसंपदा आहे, तेच करू शकतात. त्यामुळे यशाचे मार्गक्रमण करताना मेहनतीच्या बळावर ज्ञान संपन्नता मिळवून जगाचे नेतृत्व भारताला मिळवून द्या, असे प्रतिपादन वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये इन्स्पायर इन्स्टिट्युटच्या वार्षिक समारंभात गुणवंतांना पुरस्कार देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. आशिष बदखल, इन्स्पायरचे संचालक प्रा. विजय बदखल उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा. प्रयत्नांतून यश मिळते, असेही त्यांनी नमूद केले.प्रत्येक तालुक्यात सुरू होणार सुसज्ज ग्रंथालयजिल्ह्यातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करता यावे. राज्य शासनाच्या मेगा भरतीमध्ये जिल्ह्याचा टक्का वाढावा, यासाठी मिशन सेवा सुरू करण्यात आले. शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियान, डिजिटल शाळा सुरू झाल्या. अनेक ठिकाणी अभ्यासिकाही सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. मिशन सेवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलांना मान्यवरांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्या जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. आशिष बदखल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. विजय बदखल यांनी केले.