शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

दीया मिर्झाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:48 IST

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया : उन्नत चुलीवर शेकल्या पोळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सदस्यांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विदर्भात आल्या होत्या. यावेळी त्यांनी डब्ल्यूटीआयद्वारे नागझिरा, नवेगाव, ताडोबा कारिडोरच्या गावांमध्ये तयार करण्यात येत असलेल्या उन्नत चुलींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्वत: त्या चुलीवर पोळ्या सुद्धा शेकल्या. त्यांनी स्वत: बालपणात पारंपारीक चुलींमुळे होण्याऱ्या धुरामुळे महिला व बालकांना त्रास होताना पाहिले. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ज्या महिला काही कारणास्त गॅस किंवा इतर साधनांचा उपयोग करीत नाही, त्यांच्यासाठी डब्ल्यूटीआयच्या उन्नत चुलींचे प्रयत्न वरदान असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अतिथींनी ग्राम गराडा व रामपुरी येथील महिलांनी तयार केलेल्या चुलीवर मातीच्या ताव्यावर बनविलेल्या पोळ्यांचा आस्वाद घेतला.या वेळी पेंच टायगर रिझर्वचे निदेशक रविकिरण गोवेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव प्रवीण परदेशी, एशियाचे निदेशक बिट्टू सहगल, वन्यजीवप्रेमी अनिलकुमार उपस्थित होते.जंगलांचे संरक्षण व महिलांचे आरोग्यया वेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे निदेशक एरिक सोलहेइम यांनी भारतात महिला उपयोगात आणत असलेल्या पारंपरीक चुली व उन्नत चुलींची कार्यपद्धती समजून घेतली. उन्नत चुलींमुळे महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होत असून लाकडांच्या कमी वापरामुळे जंगलांचे संरक्षणही होत असल्याचे सांगितले.तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतीय निदेशक अतुल भगई यांनी, देशात दरवर्षी जवळपास २.५ लाख महिलांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे आजारी होतात. त्यामुळे भारतीय महिलांनी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अधिक कुशल व पर्यावरणास अनुकूल तंत्राचा वापर करून महिलांचे आरोग्य व पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे, अशी पंतप्रधानाची इच्छा आहे. अशात डब्ल्यूटीआयच्या वतीने उन्नत चुलींचा कार्यक्रम अधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.