शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दीया मिर्झाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:48 IST

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया : उन्नत चुलीवर शेकल्या पोळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सदस्यांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विदर्भात आल्या होत्या. यावेळी त्यांनी डब्ल्यूटीआयद्वारे नागझिरा, नवेगाव, ताडोबा कारिडोरच्या गावांमध्ये तयार करण्यात येत असलेल्या उन्नत चुलींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्वत: त्या चुलीवर पोळ्या सुद्धा शेकल्या. त्यांनी स्वत: बालपणात पारंपारीक चुलींमुळे होण्याऱ्या धुरामुळे महिला व बालकांना त्रास होताना पाहिले. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ज्या महिला काही कारणास्त गॅस किंवा इतर साधनांचा उपयोग करीत नाही, त्यांच्यासाठी डब्ल्यूटीआयच्या उन्नत चुलींचे प्रयत्न वरदान असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अतिथींनी ग्राम गराडा व रामपुरी येथील महिलांनी तयार केलेल्या चुलीवर मातीच्या ताव्यावर बनविलेल्या पोळ्यांचा आस्वाद घेतला.या वेळी पेंच टायगर रिझर्वचे निदेशक रविकिरण गोवेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव प्रवीण परदेशी, एशियाचे निदेशक बिट्टू सहगल, वन्यजीवप्रेमी अनिलकुमार उपस्थित होते.जंगलांचे संरक्षण व महिलांचे आरोग्यया वेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे निदेशक एरिक सोलहेइम यांनी भारतात महिला उपयोगात आणत असलेल्या पारंपरीक चुली व उन्नत चुलींची कार्यपद्धती समजून घेतली. उन्नत चुलींमुळे महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होत असून लाकडांच्या कमी वापरामुळे जंगलांचे संरक्षणही होत असल्याचे सांगितले.तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतीय निदेशक अतुल भगई यांनी, देशात दरवर्षी जवळपास २.५ लाख महिलांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे आजारी होतात. त्यामुळे भारतीय महिलांनी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अधिक कुशल व पर्यावरणास अनुकूल तंत्राचा वापर करून महिलांचे आरोग्य व पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे, अशी पंतप्रधानाची इच्छा आहे. अशात डब्ल्यूटीआयच्या वतीने उन्नत चुलींचा कार्यक्रम अधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.