शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

दिव्यांग प्रदीपकुमारचा दहा हजार किमीचा सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:22 IST

मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हिच जिद्द उराशी बाळगून आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे.

ठळक मुद्दे१८ जूनला नोंदविणार रेकॉर्ड : शरीर स्वास्थाच्या जनजागृतीसाठी भारत यात्रा

मंगेश भांडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हिच जिद्द उराशी बाळगून आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून तो अनेक मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ भारत, निरोगी भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षा याबाबत जनजागृती करीत आहे.प्रदीपकुमार सेन हा सायकलने प्रवास करीत मंगळवारी चंद्रपुरात पोहोचला. यावेळी त्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्याच्याकडून सुरू असलेल्या जनजागृतीची माहिती दिली. तेव्हा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी त्याचे कौतुक केले.मुळचा मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील रहिवासी असलेला प्रदीपकुमार सेन हा २५ वर्षांचा असताना १० आॅगस्ट २०१३ ला एका रस्ते अपघातात त्याचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला. त्यामुळे त्याला चालता येणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने कृत्रिम पाय बसवून घेतले. रस्ते अपघातात आपला पाय निकामी झाला, असे अनेक अपघात देशात घडतात आणि अनेकांना अपंगत्व येते. त्यामुळे यावर जनजागृती झाली पाहिजे, यासाठी त्याने भारत यात्रा करण्याचा निश्चय केला.१४ नोव्हेंबर २०१७ ला त्याने इंदौर येथून भारत यात्रेला सुरूवात केली. त्याची ही यात्रा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामीलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातून दिल्ली येथे पोहोचणार आहे. १८ जूनला ही यात्रा पूर्ण होवून दहा हजार किमी सायकल प्रवासाचा येथे रेकॉर्ड नोंदविला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदीपकुमारने ‘लोकमत’शी बोलताना दिली.चंद्रपुरात दाखल होताच येथील अनेक नागरिकांनी आस्थेने त्याची विचारपूस केली. यावेळी त्यानेही संवाद साधून यात्रेची माहिती दिली.दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचा प्रवासएका पायाने दिव्यांग असूनही कृत्रिम पायाच्या बळावर प्रदीपकुमार सायकलद्वारे भारत यात्रेला निघाला आहे. डोक्याला हेल्मेट व पाठीवर जवळपास २५ ते ३० किलो वजनाची विविध साहित्य असलेल्या बॅग आहे. या यात्रेदरम्यान अनेक मोठ्या शहरातील मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या भेटी घेवून तो स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षेचा संदेश देत आहे. दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचे अंतर पार करीत असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडरया अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी प्रदीपकुमारने अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. एका पायाने दिव्यांग असलेल्या प्रदीपकुमारची जिद्द पाहून अनेकजण थक्क झाले. अशातच केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रमुख राणी निगोंट यांनी प्रदीपकुमारला रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडर बनविण्याची इच्छा व्यक्त केली. सायकलद्वारे १० हजार किलोमीटरची भारत यात्रा पूर्ण होताच प्रदीपकुमारची रस्ते वाहतूक विभागाचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती होणार असल्याचे त्याने सांगितले.