शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट सात हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:10 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचे फलित : लाभार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.मागील सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत सदर योजनेसाठी एकून उद्दिष्टात युती सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे. शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने याबाबत शुक्रवारी परिपत्रक जारी केले. सन २०१८-१९ या वर्षाकरिता ४ हजार ५०० मंजूर उद्दिष्ट होते. त्यामध्ये २ हजार ५०० अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ७ हजार झाले आहे.जानेवारी २०१९ मध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकूल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दिष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनाला आली होती. परिणामी, संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यासाठी त्याच बैठकीत तत्काळ निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टात २ हजार ५०० घरकूलांनी वाढ झाली आहे. याआधी २०१०-११ मध्ये ५१२, सन २०११-१२ मध्ये ९५०, सन २०१२-१३ मध्ये ३७०, सन२०१३-१४ मध्ये २२०, सन २०१४-१५ मध्ये १ हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात ३ हजार ५२ आणि २०१५-१६ मध्ये ३९० सन २०१६-१७ मध्ये १ हजार २५२, सन २०१७-१८ मध्ये २ हजार तसेच सन २०१८-१९ मध्ये सात हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात १० हजार ६४२ इतके उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत युती सरकारच्या कार्यकाळात उद्दिष्टातील ही वाढ तिप्पट झाली आहे.ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर योजनेचे एकूण उद्दिष्ट सात हजार झाले आहे. त्यामुळे रमाई आवास योजनेचा लाभ घेणाºया नागरिकांची अडचण दूर झाली आहे. या योजनेपासून आता पात्र कुटुंब वंचित राहणार नाही.