शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन शिक्षक आमदार नागो गाणार यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन शिक्षक आमदार नागो गाणार यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून ना. हंसराज अहीर तर स्वागताध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित होते.दोन दिवसीय अधिवेशनात पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता शिक्षकांच्या समस्यांचे व तक्रार निवारणार्थ मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. या शिक्षकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक समस्या व तक्रारीवर नागपूर विभागाचे डॉ. उल्हास फडके, दीपक गोखले, सुदाम काकपुरे, दिलीप सुरकार, योगेश बंग यांनी समयोचित मार्गदर्शन केले. रात्री संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. यात दत्ता अक्कलवार, गणेश इंगोले, सुरदास वाभिटकर, देऊळकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.पहिल्या सत्रातील ‘आरटीई संच निर्धारण परिणाम व समायोजनाची समस्या’ या विषयावर सुदाम काकपुरे यांनी मार्गदर्शन केले. संघटन व कार्यकर्ता जडणघडण या दुसऱ्या विषयाला आश्विनी ताटीपामुलवार यांनी विविध उदाहरणे देवून साद घातली. उद्घाटनपर भाषणात ना. हंसराज अहीर यांनी शिक्षक हा शिक्षक नसून समाजाचा शिल्पकार आहे. बालमनावर संस्कार करुन, सृजन- सुसंस्कृत नागरिकांची निर्मिती करून देश घडविण्याचे सर्वात महान कार्य शिक्षक करतो. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षक क्षेत्रातील संकटाची जाणिव करुन दिली. ते म्हणाले, पूर्वी मी विधानपरिषदेत डाव्या बाजूला विरोधात बसत होतो. तेव्हाही शिक्षकांची समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो. आता विधानपरिषदेत उजव्या बाजुला सत्तापक्षाकडे बसत असलो तरी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्तापक्षाच्या विरोधात सदैव तत्पर राहील. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे यथोचित समायोजनासाठी प्रयत्नशील राहील. सात टक्के महागाई भत्ता पुढील महिन्यापर्यंत घोषित करण्यात येईल. शिक्षक सेवकांची सेवा पूर्ववत सुरू राहील, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चित यश येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिवाकर पुद्दटवार यांनी केले, तर अहवाल वाचन जिल्हा कार्यवाह प्रा. अरुण रहांगडाले यांनी केले. प्राथमिकचे अहवाल वाचन विकास नंदुरकर तर जिल्हा परिषद प्राथमिकचे अहवाल वाचन प्रकाश चुनारकर यांनी केले. संचालन शुभांगी खाडीलकर यांनी तर आभार सुरेश गिलोरकर यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गुरुदास कामडी, पुंजाराम लोडे, देवेंद्र कंचर्लावार, विनोद एडलावार, सुनील पाचखेडे, सुहास पडोळे, रमेश चिकाटे, संतोष साठे, योगराज भिवगडे, हरिश्चंद्र काळे, विपीन मानकर, प्रफुल्ल राजपुरोहित, मारोती आसुटकर, देवीदास चवले, राकेश बुटले, प्रकाश मुत्येलवार, मोहन कुकडपवार, भास्कर राऊत, चंद्रशेखर जोशी, राजू लांजेवार, सरिता सोनकुसरे, स्रेहल बांगडे, मंगला बंडीवार, चारुशिला गेडाम, विभावरी वखरे आणि समस्य कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)