शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वृक्ष लागवडीसाठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: July 1, 2017 00:34 IST

संपूर्ण महाराष्ट्राला ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देणारे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात शनिवारपासून विक्रमी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे.

वनमहोत्सवाला आजपासून प्रारंभ : रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात मुख्य कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्राला ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देणारे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात शनिवारपासून विक्रमी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी जिल्ह्याला २८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून किमान ३ ते ४ लाख अधिक वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण व सामाजिक संस्था कामी लागल्या आहेत. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रविवारी मुख्य कार्यक्रम होणार असून शनिवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोंभुर्णा येथे वृक्षारोपण होणार आहे.गेल्या वर्षीपासून वनविभागाने जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. राज्याच्या एकूण भूभागाच्या २० टक्के जंगल राज्यात आहे. हे प्रमाण ३४ टक्के असणे गरजेचे आहे. ना. मुनगंटीवार यांनी वनखात्याची धुरा स्वत:कडे घेतल्यानंतर सर्व जिल्ह्यात वनाच्छादित प्रदेश वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. या मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. जानेवारी महिन्यापर्यंत गतवर्षी करण्यात आलेल्या वृक्षलागवडीपैकी ९१ टक्के वृक्ष जिवंत होती. त्यामुळे यावर्षी आणखी सूक्ष्म नियोजन करुन ४ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन वनविभागाने केले आहे. पुढच्या वर्षी १३ कोटी तर त्यापुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन असून एकूण ५ वर्षात ५० कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वनविभाग व संबंधित संस्थांनी यावर्षी रेकार्डब्रेक वृक्षलागवड करण्याची व वृक्ष संवर्धन करण्याची मोहिम आखली आहे. मुख्य कार्यक्रम २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रस्तावित मेडीकल कॉलेजजवळ गट क्रमांक ५०३ मध्ये होणार आहे. शनिवारी मुनगंटीवार यांच्या हस्ते नवी मुंबईमधील येरोली परिसरात वनमहोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. २ जुलैला डम्पींग ग्राऊड येथे महापौर अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेने देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहे. १ जुलैला पोंभूर्णा येथील घनोटी गावात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिल्या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये व व्यक्तीगत ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. वृक्षदिंडीची धूमयावर्षी राज्यात पहिल्यांदा चंद्रपूर जिल्हा परिषदेने वृक्षलागवड व संवर्धनासाठी वृक्षदिंडी काढण्याचा विक्रम केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात १५ तालुक्यातील ५० गावात वृक्ष संवर्धन व संगोपनाची वृक्षदिंडी काढण्यात आली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्याचा मोठा लाभ यावर्षी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोण, किती लावणार वृक्ष१ ते ७ जुलै या काळात सर्वात जास्त वृक्ष लावण्याची जबाबदारी वनविभागाने घेतली आहे. वनविभाग १७ लाख २८ हजार वृक्ष लावून व त्याचे संगोपन करणार आहे. वनविकास महामंडळ ८ लाख ८१ हजार, जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायती मिळून ४ लाख १३ हजार, ३४ शासकीय यंत्रणा २ लाख ५० हजार, सामाजिक वनीकरण विभाग १ लाख वृक्ष लावणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाने यावर्षी सर्व ग्रामपंचायतीना वृक्ष पोहचविण्याचे काम केले आहे. मोठ्या प्रमाणात रोपे देण्यात आली असून चंद्रपूरमध्ये दोन महोत्सव केंद्र सुरु करण्यात आले आहे. रेंजर आॅफिस व मुख्य वनसंरक्षक कार्यालय येथून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन देण्यात येत असून महानगरपालिकेने देखील कचरा उलचणाऱ्या घंटागाडीला रोपे पुरविणारी पूरक यंत्रणा बनवत घरोघरी रोपे पुरविण्याचे काम सुरु केले आहे.