शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:41 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले.

ठळक मुद्देवरूणराजाचा दगा : ८८ टक्के धान करपण्याच्या मार्गावर, नदी, नाले, प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले. परिणामी अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. कसेबसे पीक वाढले, तर ते जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी-नाले एकदाही दुथडी भरून वाहले नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही अद्याप कोरडेच आहे. यामुळे जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात दिसत आहे.नद्या, नाले अजूनही तहानलेलेच दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या यंदा पावसाळा संपूनही कोरड्याच आहेत. दरवर्षी या कालावधीत नद्या दुथडी भरून वाहात असत. वर्धासारख्या मोठ्या नदीत जेमतेम पाणी आहे. इतर नद्यांचे तर पात्र कोरडेच आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची चाहुल लागत आहे. काही ठिकाणी पावसाळ्यातच उन्हाळ्यागत स्थिती आहे.पाण्यामुळ शेतपिके धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकटाची चिन्हे दिसत आहे. खरीप हंगामच पाण्याविना जात आहे तर रब्बीची पिके कशी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यात वर्धा नदीसारख्या मोठ्या नद्या बारमाही पाणी वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नद्यांच्या तीरावरील गावांना पुराचा फ टका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येत असते. मात्र यंदा पावसाळा संपत आला असला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहेत. लहान नाले तर पाण्यासाठी आतुर झालेले आहेत. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आलेला नाही. परिणामी आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचे संकेत देत आहे.राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात या पावसाळ्यात १० टक्केच पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. गावातील तलावांमध्ये ठणठणाट आहे. पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न शेतकºयांची चिंंता वाढविणारा ठरत आहे. यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाउस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मात्र हा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ १५ ते २० टक्के इतकी आहे. आॅगस्ट महिन्यात केवळ काही दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे. यावर शासनाने आताच उपाययोजना करावी, अन्यथा पाण्यासाठी वनवन भटकण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.