शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:41 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले.

ठळक मुद्देवरूणराजाचा दगा : ८८ टक्के धान करपण्याच्या मार्गावर, नदी, नाले, प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले. परिणामी अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. कसेबसे पीक वाढले, तर ते जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी-नाले एकदाही दुथडी भरून वाहले नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही अद्याप कोरडेच आहे. यामुळे जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात दिसत आहे.नद्या, नाले अजूनही तहानलेलेच दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या यंदा पावसाळा संपूनही कोरड्याच आहेत. दरवर्षी या कालावधीत नद्या दुथडी भरून वाहात असत. वर्धासारख्या मोठ्या नदीत जेमतेम पाणी आहे. इतर नद्यांचे तर पात्र कोरडेच आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची चाहुल लागत आहे. काही ठिकाणी पावसाळ्यातच उन्हाळ्यागत स्थिती आहे.पाण्यामुळ शेतपिके धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकटाची चिन्हे दिसत आहे. खरीप हंगामच पाण्याविना जात आहे तर रब्बीची पिके कशी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यात वर्धा नदीसारख्या मोठ्या नद्या बारमाही पाणी वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नद्यांच्या तीरावरील गावांना पुराचा फ टका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येत असते. मात्र यंदा पावसाळा संपत आला असला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहेत. लहान नाले तर पाण्यासाठी आतुर झालेले आहेत. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आलेला नाही. परिणामी आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचे संकेत देत आहे.राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात या पावसाळ्यात १० टक्केच पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. गावातील तलावांमध्ये ठणठणाट आहे. पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न शेतकºयांची चिंंता वाढविणारा ठरत आहे. यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाउस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मात्र हा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ १५ ते २० टक्के इतकी आहे. आॅगस्ट महिन्यात केवळ काही दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे. यावर शासनाने आताच उपाययोजना करावी, अन्यथा पाण्यासाठी वनवन भटकण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.