शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली

By admin | Updated: January 8, 2017 00:43 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी हे नागभीडला येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे निमित्त : आमचाच जिल्हा करा; ब्रह्मपुरी व नागभीडकरांची मागणीब्रह्मपुरी/नागभीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी हे नागभीडला येत आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी व नागभीडकरांची जिल्ह्याची मागणी पुन्हा गुंजू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याच तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी प्रत्येकजण करताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्रह्मपुरी उपविभागात येत असलेल्या नागभीड शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. त्यांच्या येण्याने पुन्हा एकदा ब्रह्मपुरीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व या निमित्याने ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पूर्ण करण्याची विनंती ब्रह्मपुरीकरांकडून केली जात आहे.सन १९८२ ला संयुक्त चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनासाठी नविन जिल्ह्याचा विचार शासनदरबारी करण्यात आला होता. तेव्हा गडचिरोलीला प्राधान्य देऊन ब्रह्मपुरीवर अन्याय करण्यात आला. गेल्या ३५ वर्षापासूनची ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी दुर्लक्षित आहे. मुख्यमंत्री हे विदर्भाचे सुपुत्र असून राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहात. त्यांना ब्रह्मपुरी स्थानाविषयी सर्वकाही माहित आहे. एवढेच नव्हे तर ते ब्रह्मपुरीला यापूर्वी अनेकदा येवून गेले आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरणाची कल्पना आहे. सर्वदृष्ट्या एक अग्रगण्य तालुका म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर ब्रह्मपुरीकडे उपजिल्ह्याच्या नजरेतून पाहत आहेत. ब्रह्मपुरीवर होत असलेला अन्याय आतातरी मुख्यमंत्र्यांनी दूर करावा, अशी अपेक्षा ब्रह्मपुरीकरांची आहे.मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने दुसरीकडे नागभीडकरांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेवून चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी नागभीडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी व अन्य अनेक महत्वपूर्ण नेत्यांना आमंत्रित करून एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचवेळी चिमूरमध्ये जिल्ह्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण जिल्हा निर्मिती होणारच असेल तर नेतृत्वानेही नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेवून नागभीडलाच जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशा प्रतिक्रिया नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही या तालुक्यातून येत आहेत.चिमूर चंद्रपूर जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. ब्रह्मपुरी ते चिमूर हे अंतर ६५ किमी आहे. नागभीडही ४५ किमी आहे. सिंदेवाहीचे असेच आहे. शिवाय चिमूरला जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही सोय नाही. उलटपक्षी नागभीड हे एक असे स्थान आहे की ते चिमूर, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीलाही मध्यवर्ती आहे. ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीकरांना नागभीडला येण्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे.असे असूनही या सुविधांचा आणि नागभीडच्या मध्यवर्ती स्थानाचा कोणताही सारासार विचार न करता राजकीय नेतृत्वाकडून चिमूरला जो अग्रक्रम देण्यात येत आहे. तो खरं म्हणजे नागभीड, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही या तीन तालुक्यांना आणखी समस्येच्या खाईत लोटल्यासारखे आहे. आम्हाला समस्येच्या खाईत लोटण्यापेक्षा वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध असलेले चंद्रपूर काय वाईट, अशी मते आता नागरिकच व्यक्त करू लागली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती ठिकाण म्हणून जिल्ह्यासाठी नागभीडचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी यानिमित्ताने नागभीडवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)