शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवारांच्या बढतीने जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:05 IST

लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला विरोधी पक्ष नेतेपदाचा पहिल्यांदाच सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही या कामगिरीची दखल घेत वडेट्टीवारांच्या खांद्यावर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपविली. वडेट्टीवारांच्या रुपाने न भुतो असे हे पद मिळाल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे.अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली. यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असताना ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र निकालात भाजपने २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही मुसंडी मारली. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय संपादन करता आला. बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये आणून लोकसभा निवडणूक लढण्याची राजकीय खेळी आमदार वडेट्टीवार यांचीच होती. ही ती यशस्वी झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व दिसत आहे. धानोरकरांच्या तिकीटाला पक्षांतर्गत कमालीचा विरोध असतानाही वडेट्टीवारांनी हार मानली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्या मदतीला धावून आली आणि अखेरच्या क्षणी धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न वडेट्टीवारांनी केला नसता तर कदाचित महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला असता. या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणात विजय वडेट्टीवार या नावाला वजन प्राप्त झाले.लोकसभेच्या उपलब्धीसह त्यांची कणखरपणे सुरू असेलली राजकीय कारकिर्द पक्षश्रेष्ठींना दखल घेण्यास कारणीभूत ठरली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्याला वडेट्टीवारांच्या रुपाने विधानसभेत मिळालेला सन्मान जिल्ह्यातील काँग्रेससाठी अच्छे दिनची नांदी असल्याचे बोलले जात आहे.