शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वडेट्टीवारांच्या बढतीने जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:05 IST

लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला विरोधी पक्ष नेतेपदाचा पहिल्यांदाच सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही या कामगिरीची दखल घेत वडेट्टीवारांच्या खांद्यावर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपविली. वडेट्टीवारांच्या रुपाने न भुतो असे हे पद मिळाल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे.अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली. यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असताना ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र निकालात भाजपने २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही मुसंडी मारली. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय संपादन करता आला. बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये आणून लोकसभा निवडणूक लढण्याची राजकीय खेळी आमदार वडेट्टीवार यांचीच होती. ही ती यशस्वी झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व दिसत आहे. धानोरकरांच्या तिकीटाला पक्षांतर्गत कमालीचा विरोध असतानाही वडेट्टीवारांनी हार मानली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्या मदतीला धावून आली आणि अखेरच्या क्षणी धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न वडेट्टीवारांनी केला नसता तर कदाचित महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला असता. या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणात विजय वडेट्टीवार या नावाला वजन प्राप्त झाले.लोकसभेच्या उपलब्धीसह त्यांची कणखरपणे सुरू असेलली राजकीय कारकिर्द पक्षश्रेष्ठींना दखल घेण्यास कारणीभूत ठरली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्याला वडेट्टीवारांच्या रुपाने विधानसभेत मिळालेला सन्मान जिल्ह्यातील काँग्रेससाठी अच्छे दिनची नांदी असल्याचे बोलले जात आहे.