शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर.

ठळक मुद्देआता एसडीएमकडे जीएमसीचे नियंत्रण । कोविड रूग्णालयात अधिकाधिक डॉक्टर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. उपविभागीय दंडाधिकाºयांची या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आठ हजारांचा टप्पा गाठू लागली आहे. यातून चार हजारांवर रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी तीन हजारांवर रुग्ण उपचार घेत आहे. एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा सेवा देण्यात कमी पडू लागली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरबाबत रुग्णांच्या नातलगांच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याकडे स्वत: लक्ष देणे सुरू केले आहे. त्यांनी सर्वप्रथम या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी रोहन घुगे यांची प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या १२१ डॉक्टर्स कार्यरत आहेत. मात्र कोविड रुग्णालयात फार कमी डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जास्तीत जास्त डॉक्टर्स कोविड रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.- अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी चंद्रपूर.आता मदत कक्षरुग्णाला किंवा त्याच्या नातलगांना काही समस्या जाणवत असेल वा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांना तत्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे.मास्क नाही, मग ५०० रुपये दंडकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेकजण घराबाहेर पडताना मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता मात्र मास्क न वापरणाºयाविरुध्द थेट ५०० रुपये दंड वसूल होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी