शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले गाढव वाचविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:16 IST

राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देगणना सुरू होणार । गणनेची जबाबदारी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा आदेश जिल्ह्यात धडकल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला गाढवांची माहिती संकलित करावी लागणार आहे.गाढव हा प्राणी कष्टाळू म्हणून जगभरात ओळखल्या जातो. मात्र या प्राण्याला मानवाकडून सम्मान दिला जात नाही. प्राणी जगतामध्ये याच प्राण्याच्या वाट्याला सर्वात मोठी उपेक्षा आली. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार राज्यात २९ हजार १३२ गाढव आहेत. हा प्राणी पाळीव असला तरी त्याच्याकडून कामे करून मोकाट सोडल्या जाते. प्रामुख्याने भटक्या जमातींमध्ये हा प्राणी पाळल्या जातो. कष्टाची करण्यास हा प्राणी थकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या प्राण्यांच्या संवर्धनासाठी कागदोपत्री योजना आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नाही, असा भटक्या जमाती संघटनांचा आरोप आहे.गाढव या प्राण्याबाबत देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी १० सप्टेंबर २०१७ ला दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाढवांची संख्या कमी होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला यासंदर्भात दिली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी.डी. फरकाडे यांनी कार्यवाही सुरू केली. यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना मागील आठवड्यात आदेश दिला. जिल्ह्यामध्ये गाढवांची संख्या किती याची माहिती सादर करण्याचे कळविण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभाग ही माहिती गोळा करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यामुळे जिल्ह्यात गाढवांची संख्या किती हे जाहीर होणार आहे.गाढव उपयुक्त प्राणीगाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर पशु खाद्यामध्ये केला जातो. शिवाय विविध आजारांवरील उपचाराकरिता गाढवांच्या रक्ताचा वापर होतो. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये गाढवांच्या कत्तली होतात. हा प्राणी पाळीव असून मानवाला संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी