शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आदर्श ग्राम घाटकुळचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:39 IST

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली.

ठळक मुद्देगावकऱ्यांशी संवाद : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श गाव स्पर्धेत समावेश असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ गावाची जिल्हास्तरीय तपासणी आज गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केली व गावकºयांशी संवाद साधला.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व शासकीय योजनांच्या समायोजनातून घाटकूळ गावाचा अल्पावधीतच कायापालट झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिवतीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पोंभुर्णा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल, चंद्रशेखर गजभिये, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी अतकुलवार व डब्ल्यूसिटी प्रतिनिधी या जिल्हास्तरीय समितीने घाटकूळ गावाची पाहणी केली.गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आयएसओ नामांकित असल्याबाबत कौतुक केले. शोषखड्डे, शौचालय, घरकूल, बायोगॅस, पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, श्रमदानातून झालेली कामे याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली. घाटकुळ येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रामसेवक ममता बक्षी यांनी जिल्हाधिकाºयांना माहिती दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, सरपंच प्रिती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, प्रज्ञा देठे, सुनिता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.लोकसहभागातून गाव घडवाजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी गावकºयांशी संवाद साधला. महिला बचत गटाने श्रमदानातून केलेला नाली उपसा व युवक मंडळाने विहिरीतील गाळ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. गावात राबविलेल्या शासकीय योजनांचा आढावा घेतला. गावकºयांनी घरपट्टी, पाणीपट्टी शंभर टक्के भरुन ग्रामविकासात योगदान द्यावे. लोकसहभागातून आदर्श गाव घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी