शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्राम घाटकुळचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:39 IST

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली.

ठळक मुद्देगावकऱ्यांशी संवाद : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श गाव स्पर्धेत समावेश असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ गावाची जिल्हास्तरीय तपासणी आज गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केली व गावकºयांशी संवाद साधला.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व शासकीय योजनांच्या समायोजनातून घाटकूळ गावाचा अल्पावधीतच कायापालट झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिवतीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पोंभुर्णा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल, चंद्रशेखर गजभिये, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी अतकुलवार व डब्ल्यूसिटी प्रतिनिधी या जिल्हास्तरीय समितीने घाटकूळ गावाची पाहणी केली.गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आयएसओ नामांकित असल्याबाबत कौतुक केले. शोषखड्डे, शौचालय, घरकूल, बायोगॅस, पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, श्रमदानातून झालेली कामे याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली. घाटकुळ येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रामसेवक ममता बक्षी यांनी जिल्हाधिकाºयांना माहिती दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, सरपंच प्रिती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, प्रज्ञा देठे, सुनिता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.लोकसहभागातून गाव घडवाजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी गावकºयांशी संवाद साधला. महिला बचत गटाने श्रमदानातून केलेला नाली उपसा व युवक मंडळाने विहिरीतील गाळ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. गावात राबविलेल्या शासकीय योजनांचा आढावा घेतला. गावकºयांनी घरपट्टी, पाणीपट्टी शंभर टक्के भरुन ग्रामविकासात योगदान द्यावे. लोकसहभागातून आदर्श गाव घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी