शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा, तालुका न्यायालय उघडले मात्र बाररूम बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.

ठळक मुद्देवकिलांना बसण्यास अडचण : जिल्हा व सत्र न्यायाधिशांना बार असोसिएशनचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्हा व तालुका न्यायालयाचे कामकाज दोन सत्रामध्ये सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वकीलांच्या बसण्याची खोली म्हणजे बार रूम बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्याची मागणी चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधिशांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली.त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.तसेच कोर्टरूममध्येही बसण्यासाठी अथवाउभे राहण्यास परवागनी नाही. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत न्यायालयाचे कामकाज चालल्यास इतका वेळ कुठे थांबायचे असा प्रश्न बार असोशिएशनने विचारला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायाधिशांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.१६ जून रोजी लागणार निर्णयसर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच बाररूम बंद आहेत. कामकाज सुरू होऊनही बाररूम बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा न्यायालय परिसरात विशेष खबरदारी घेतल्या जात आहे. त्यासाठी बार असोसिएशन देखील विशेष लक्ष देत आहे. बाररूम समस्येबाबत १६ जून २०२० रोजी उच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याने त्याकडे आमचे लक्ष आहे, अशी माहिती चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी ‘लोकमत’ला दिली.वकीलच न्यायालयाबाहेर ताटकळतराजुरा : न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात सुरू झाले. मात्र, बाररूम बंद असल्याने वकिलांना न्यायालयाबाहेर उन्हात बसावे लागत आहे. वकिलांना बसण्याची दुसरी कुठेही व्यवस्था नसल्याने ताटकळत राहावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गैरसोय वाढ ूशकते. बार रूममध्ये काही ज्येष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यास तयार आहोत. मात्र, बाररूम खुली करण्याची मागणी राजुरा तालुका तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण धोटे, सचिव अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, अ‍ॅड. निनाद येरणे, अ‍ॅड. मुरलीधर देवाडकर, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, अ‍ॅड. मंगेश बोबाटे, अ‍ॅड. विजय पुणेकर यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालय