शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

जिल्हा, तालुका न्यायालय उघडले मात्र बाररूम बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.

ठळक मुद्देवकिलांना बसण्यास अडचण : जिल्हा व सत्र न्यायाधिशांना बार असोसिएशनचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्हा व तालुका न्यायालयाचे कामकाज दोन सत्रामध्ये सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वकीलांच्या बसण्याची खोली म्हणजे बार रूम बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्याची मागणी चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधिशांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली.त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.तसेच कोर्टरूममध्येही बसण्यासाठी अथवाउभे राहण्यास परवागनी नाही. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत न्यायालयाचे कामकाज चालल्यास इतका वेळ कुठे थांबायचे असा प्रश्न बार असोशिएशनने विचारला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायाधिशांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.१६ जून रोजी लागणार निर्णयसर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच बाररूम बंद आहेत. कामकाज सुरू होऊनही बाररूम बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा न्यायालय परिसरात विशेष खबरदारी घेतल्या जात आहे. त्यासाठी बार असोसिएशन देखील विशेष लक्ष देत आहे. बाररूम समस्येबाबत १६ जून २०२० रोजी उच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याने त्याकडे आमचे लक्ष आहे, अशी माहिती चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी ‘लोकमत’ला दिली.वकीलच न्यायालयाबाहेर ताटकळतराजुरा : न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात सुरू झाले. मात्र, बाररूम बंद असल्याने वकिलांना न्यायालयाबाहेर उन्हात बसावे लागत आहे. वकिलांना बसण्याची दुसरी कुठेही व्यवस्था नसल्याने ताटकळत राहावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गैरसोय वाढ ूशकते. बार रूममध्ये काही ज्येष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यास तयार आहोत. मात्र, बाररूम खुली करण्याची मागणी राजुरा तालुका तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण धोटे, सचिव अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, अ‍ॅड. निनाद येरणे, अ‍ॅड. मुरलीधर देवाडकर, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, अ‍ॅड. मंगेश बोबाटे, अ‍ॅड. विजय पुणेकर यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालय