शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’ साठी जिल्ह्यात अलर्ट

By admin | Updated: February 8, 2015 23:31 IST

नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून सावली तालुक्यातील

चंद्रपूर : नागपूर, अमरावती या शहरात स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून सावली तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील रुग्णावर उपचार सुरु आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून ‘स्वाईन फ्लू’ साठी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यात ३ ठिकाणी स्क्रिनींग सेंटर तयार करण्यात आले असून आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष रामभाऊ पगडपल्लीवार (४५) यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ७ फेब्रुवारीला ब्रह्मपुरी येथील देवराव जयराज येनगुरे (४२) यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. पुढील उपचारासाठी त्यांनाही नागपूर येथे पाठविण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कार्यरत असलेले देवराव येनगुले हे आठ दिवसापूर्वी सकाळी फिरत असताना अचानक कोसळले. त्याना ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. तेथील डॉक्टरांनी रक्ताचे नमूने पुणे येथे पाठवून तपासणी केली असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. विषम तापमानामुळे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल ‘एच-वन’ आणि ‘एन-वन’ या स्वाईन फ्ल्यू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही स्वाईन फ्ल्यूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे. स्वाईन फ्ल्यूचा प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने रुग्णांमध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केले आहेत. ए, बी, सी अशी वर्गवारी करून त्या पध्दतीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यातून सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विषाणूच्या संसर्गाने होणारा आजार असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुध्दा सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून योग्य साधने पुरविण्यात आली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)