शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या निवाड्यासाठी जिल्हा कृषी प्राधिकरण स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:32 IST

Agriculture Authority Chandrapur news राज्यातील शेतीसंदर्भातील वादविवादांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रारूप समितीकडून आराखडा तयारहिवाळी अधिवेशनात अहवाल सादर होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील शेतीसंदर्भातील वादविवादांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप समितीची गठित झाली. ही समिती येत्या १५ दिवसात आपला अहवाल नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाला सादर करण्याची शक्यता आहे.

खरीप व रब्बी हंगामादरम्यान निकृष्ट व सदोष बियाणे, निकृष्ट खते, किटकनाशके, पीक विमाच्या अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात. अशा प्रकरणांचा वर्षानुवर्ष निकाल लागत नाही. त्यामुळे भरपाई मिळण्याची शक्यता कमीच असते. या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना कृषी प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर दाद मागण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संविधानातील ३२३ बी (२) (जी) या तरतुदीचा वापर करून राज्यस्तरावर कृषी विषयक अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार राज्यांना आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या याच अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच प्राधिकरणासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या प्रक्रियेला गती आली आहे. जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरणाकरिता लागणारे मनुष्यबळ, निधीची तरतूद याबाबतही समिती आपल्या अहवालात उल्लेख करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत या आराखड्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली.किसान काँग्रेसने दिला होता प्रस्तावया संदर्भातील प्रस्ताव किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी सादर केला होता. त्या प्रस्तावावर आधारित ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. कृषी प्राधिकरणाकडून होणाºया निवड्यासंदर्भातील आराखडा तयार झाला आहे. त्यावर विधी व न्याय विभागाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अ‍ॅड. अजय तल्हार, अ‍ॅड. शिरीश हिरे, संजय लाखे पाटील व देवानंद पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती