शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्यात ४०२ मुलींना फूस लावून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:33 IST

मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देआढावा बैठक : आळा घालण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक स्तरावर असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे अशा गुन्ह्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कठोर कारवाईची भुमिका स्वीकारावी, असे सक्त निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या गुन्हे विषयक प्रकरणांचा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांनी आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर व प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. अहीर यांनी अनेक गंभीर गुन्ह्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास कार्याला गती द्यावी, तपास अधिकाऱ्यांना कालबध्द अवधीमध्ये तपासाचा छडा लावण्याची सूचना द्यावी व अशा गंभीर प्रकरणांच्या तपास प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी आढावा घेवून कार्य अहवाल मागवावा, अशी सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी केली.फुस लावून पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील मुलींची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली जावी, भादंवि कलम ३७६, ३५४ व पास्को यासारख्या कलमांचा अपराधाची तीव्रता व परिस्थितीजन्य पुराव्याच्या पार्श्वभूमिवर वापर केला जावा. तरच अशा असामाजिक कृत्य करणाºया प्रवृत्तींवर पायबंद घालणे शक्य होईल. सन २०१३ ते २०१७ पर्यंतच्या गुन्हेविषयक अहवालानुसार अपहरण, फुस लावून व लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व सज्ञान मुली पळवून नेण्याचे आकडे चिंतेत भर घालणारे आहे, असे ना. अहीर म्हणाले. या बैठकीला विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, एसडीपीओ सुशिलकुमार नायक, शेखर देशमुख, पवार, हिरे, पोलीस निरीक्षक गोतमारे, भगत, आमले, शिरस्कर यांची उपस्थिती होती.उपाययोजना करासन २०१३ मध्ये २६, २०१४-३८, २०१५-९८, २०१६-८४ व २०१७ मध्ये मुलीला पळवून किंवा फुस लावून नेण्याच्या १५६ अशा ४०२ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ना. अहीर यांनी पोलिसांना केल्या.