शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

ठळक मुद्देजून महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण : जिल्ह्यात अन्नधान्याची कमतरता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुभार्वाच्या काळात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. जून महिन्यात शिधापत्रिका धारकांना एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण करण्यात आले. या कालावधीत धान्याची टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले.जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दोन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती पाच किलो तांदुळ कुटुंबातील जणांच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.साडेसात हजार क्विंटल डाळ वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये ७५ हजार ५९३ क्विंटल तांदूळ व ८ हजार ६६४ क्विंटल डाळ वाटप करण्यात आले. या योजनेतंर्गत माहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य वितरण करायचे. यामध्ये ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. एपीएल योजनेचे धान्य वाटपाची मदतही जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे.पोर्टबिलीटी यंत्रणेचा प्रभावी वापरराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये सुमारे ५० हजार ४१३ क्विंटल गहू, ४७ हजार १७७ क्विंटल तांदूळ, तर एक हजार ३५२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ५ हजार ५९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.जून महिन्यात चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या ५ दुकानदारांविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू व औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता यंत्रणा खबरदारी घेत आहे.- राजेंद्र मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या