शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

ठळक मुद्देजून महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण : जिल्ह्यात अन्नधान्याची कमतरता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुभार्वाच्या काळात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. जून महिन्यात शिधापत्रिका धारकांना एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण करण्यात आले. या कालावधीत धान्याची टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले.जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दोन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती पाच किलो तांदुळ कुटुंबातील जणांच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.साडेसात हजार क्विंटल डाळ वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये ७५ हजार ५९३ क्विंटल तांदूळ व ८ हजार ६६४ क्विंटल डाळ वाटप करण्यात आले. या योजनेतंर्गत माहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य वितरण करायचे. यामध्ये ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. एपीएल योजनेचे धान्य वाटपाची मदतही जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे.पोर्टबिलीटी यंत्रणेचा प्रभावी वापरराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये सुमारे ५० हजार ४१३ क्विंटल गहू, ४७ हजार १७७ क्विंटल तांदूळ, तर एक हजार ३५२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ५ हजार ५९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.जून महिन्यात चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या ५ दुकानदारांविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू व औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता यंत्रणा खबरदारी घेत आहे.- राजेंद्र मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या