शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण

By admin | Updated: November 8, 2015 01:16 IST

दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे.

चंद्रपूर : दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे. भारतीय खाद्य निगमने पाठवलेला हा गहू परत न पाठवता तो जशाच्या तशा लोकांना वाटला जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा संपात व्यक्त होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमध्ये जे धान्य वितरित केले जाते. त्याचा पुरवठा भारतीय खाद्य निगमद्वारे केला जातो. रेल्वेने हा माल चंद्रपुरात पाठवला जातो. नंतर तो वखार महामंडळाच्या गोदामामध्ये वाळवून नंतर त्याचा पुरवठा अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानात केला जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हा निकृष्ट गहू येथील गोदामांमध्ये आला. तेव्हाच तो निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे अडीचशे पोते हा गहू होता. गुरेसुद्धा खाऊ शकणार नाही, इतका त्याचा दर्जा सुमार आहे. आधी हा गहू परत पाठवू, असे म्हणणारा पुरवठा विभाग नंतर कसा राजी झाला, हेच कळायला मार्ग नाही. याआधी याची वाच्यता माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने फूड कॉर्पो रेशन इंडियाला पत्र पाठवून गव्हाची उचल करणार नाही, असे पत्र पाठवले. पण, आता तोच गहू गोरगरीबांना वाटला जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सणासुदीच्या दिवसात असा निकृष्ट गहू गोरगरिबांच्या माथी मारुन त्याची थट्टा केली जात आहे. पर्याय नसल्यामुळे तो घ्यावा लागतो, अशी अगतिकता लोकांनी व्यक्त केली. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची काहीही चुकी नाही. त्यांना जसा पुरवठा झाला, तसा ते वाटप करीत आहेत. तांदूळ आणि साखर चांगली आहे. पण गहू खराब असल्याने रेशन दुकानदारही चिंतीत आहेत. पण, त्यांचाही नाईलाज आहे. लोकांंना तो वाटण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना राबवून, त्यांच्याच मतांवर निवडून येऊन, त्यांचीच अशी गती केली जात असेल, तर मायबाप सरकार कोणत्या कामाचे, असा प्रश्न आता हे गोरगरीब करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)