शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण

By admin | Updated: November 8, 2015 01:16 IST

दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे.

चंद्रपूर : दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे. भारतीय खाद्य निगमने पाठवलेला हा गहू परत न पाठवता तो जशाच्या तशा लोकांना वाटला जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा संपात व्यक्त होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमध्ये जे धान्य वितरित केले जाते. त्याचा पुरवठा भारतीय खाद्य निगमद्वारे केला जातो. रेल्वेने हा माल चंद्रपुरात पाठवला जातो. नंतर तो वखार महामंडळाच्या गोदामामध्ये वाळवून नंतर त्याचा पुरवठा अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानात केला जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हा निकृष्ट गहू येथील गोदामांमध्ये आला. तेव्हाच तो निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे अडीचशे पोते हा गहू होता. गुरेसुद्धा खाऊ शकणार नाही, इतका त्याचा दर्जा सुमार आहे. आधी हा गहू परत पाठवू, असे म्हणणारा पुरवठा विभाग नंतर कसा राजी झाला, हेच कळायला मार्ग नाही. याआधी याची वाच्यता माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने फूड कॉर्पो रेशन इंडियाला पत्र पाठवून गव्हाची उचल करणार नाही, असे पत्र पाठवले. पण, आता तोच गहू गोरगरीबांना वाटला जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सणासुदीच्या दिवसात असा निकृष्ट गहू गोरगरिबांच्या माथी मारुन त्याची थट्टा केली जात आहे. पर्याय नसल्यामुळे तो घ्यावा लागतो, अशी अगतिकता लोकांनी व्यक्त केली. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची काहीही चुकी नाही. त्यांना जसा पुरवठा झाला, तसा ते वाटप करीत आहेत. तांदूळ आणि साखर चांगली आहे. पण गहू खराब असल्याने रेशन दुकानदारही चिंतीत आहेत. पण, त्यांचाही नाईलाज आहे. लोकांंना तो वाटण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना राबवून, त्यांच्याच मतांवर निवडून येऊन, त्यांचीच अशी गती केली जात असेल, तर मायबाप सरकार कोणत्या कामाचे, असा प्रश्न आता हे गोरगरीब करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)