शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
2
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
5
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
6
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
7
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
8
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
9
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
10
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
11
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
13
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
14
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
15
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
16
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
17
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
18
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
19
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
20
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरित करा

By admin | Updated: July 16, 2014 00:06 IST

कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा

चंद्रपूर : कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांना मोफत त्वरित बीयाणे पुरविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. मागील वर्षीच्या नैसर्गिक कोपामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला दुबार पेरणी करण्याकरिता बी-बियाणे, खते घेणे व दुबार पेरणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना ेबियाणे व खते मोफत पुरविण्यात यावे व वाहकावरील अर्थसहाय्य करण्यात यावे, याकरिता शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली.मागील वर्षी राज्यात काही भागात गारपीट झाले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु तलाठ्यांनी या भागात गारपीट झालीच नाही, असा अहवाल तहसिलदारांना सादर केला. त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. असा अन्याय जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबियांवर होवू नये अशी विनंती करण्यात आली. कोणत्याही तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित राहिल्यास जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.शिष्टमंडळात, रमेश तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, जयदीप रोडे, अविनाश पुट्टेवार, कुसूमताई उदार, मनोज पाल, रुपेश वाघाडे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)