शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जि. प. शाळांना द्यावा लागणार २० वर्षांच्या खर्चाचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

समग्र शिक्षा, सर्व शिक्षा व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील सर्व योजनांसाठी केंद्र शासनाकडून राज्याला कोट्यवधींचा निधी देण्यात आला. मात्र, ...

समग्र शिक्षा, सर्व शिक्षा व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील सर्व योजनांसाठी केंद्र शासनाकडून राज्याला कोट्यवधींचा निधी देण्यात आला. मात्र, या निधीचे समायोजन झाले नाही. लेखापरीक्षण अहवालात अग्रीम रक्कम शिल्लक आहे. शिल्लक रकमेबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारकडे तीव्र नाराजी दर्शविली. या रकमेचे समायोजन करून अग्रीम रक्कम शून्य केल्याशिवाय निधी मिळणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला. दरम्यान, राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व मेसर्स व्ही. बी. शर्मा अँड कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीनंतर राज्य शासनाचा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे धडकताच त्यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी निर्देश जारी करून माहिती मागितली. रोखपाल व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना २१ सप्टेंबर २०२१ रोजी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

बॉक्स

अशा आहेत अटी

२००२ ते २०२०-२१ पर्यंत सर्व जि. प. शाळांचा वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे, तालुकानिहाय प्रपत्रात एमआरपी व अखर्चित निधीही धनादेशाद्वारे परत करावा लागणार आहे. बीआरसी, सीआरसी, एसएमसीचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र येथे उघडून अहवाल सादर करणे, खर्चाचे देयक सादर करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

बॉक्स

मुख्याध्यापक धास्तावले

समग्र शिक्षा अंतर्गत सर्व माहिती पं. स. स्तरावरून गटशिक्षणाधिकारी हे अधीनस्त कर्मचाऱ्यांकडून गोळा करतील. मात्र, या माहितीसाठी मुख्याध्यापकांचे अहवाल महत्त्वपूर्ण आहेत. २० वर्षांत शेकडो मुख्याध्यापकांची बदली व सेवानिवृत्ती झाली. अशा परिस्थितीत पं. स. कडून संबंधित माहिती मागितली जाऊ शकते. त्यामुळे जि. प. शाळांचे मुख्याध्यापक धास्तावले आहेत.