शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:45 IST

बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.

ठळक मुद्देप्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था : गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.जिल्ह्यात १५०० सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे तर ११ हजार ८५० घरगुती गणेशमूर्तीची स्थापना मागीलवर्षी करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये २९६ गणेशमंडळांद्वारे तर तीन हजार १५ घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली होती. जिल्ह्यात गणपतीची वाजत-गाजत स्थापना व विसर्जन करण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने गणेशमूर्ती स्थापना करण्यासाठी नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असतानासुद्धा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गणेशभक्तांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगला ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुनच गणेशभक्तांना गणपतीची मूर्ती न्यावी लागते. मागील काही वर्षांपासून शासनाने प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यास बंदी घातली आहे. भक्तांना मातीच्या गणपतीची स्थापना करावी लागते. मूर्तीकार तणस व मातीच्या साह्याने मूर्तीला आकार देत आहेत. गणेशाची मूर्ती स्थापनेसाठी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांना सामोरे जाण्याची पाळी आहे. गणेशभक्तांची ही समस्या लक्षात घेऊन बांधकाम विभाग व मनपाने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.अरुंद रस्त्यामुळे त्रासशहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यातही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हे रस्ते पुन्हा अरुंद झाले आहेत. त्यातही वाहनचालक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन ठेवतात. यातून वाहतूकीची कोंडी होत असते. यातच शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे भक्तांना गणपती मूर्तीची स्थापना करण्यासाठी घरी नेताना अडचणींचा सामना करावा लागतो.१५ दिवसांतच उखडले रस्तेचंद्रपुरात मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यांची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना केवळ माती मिश्रित साहित्यांचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्याभरात पाच दिवस संततधार पाऊस पडल्याने डागडूजी केलेले रस्ते पूर्णपणे उखडले आहेत.जटपुरा गेट ठरतो अडसरशहरातील ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेतर्फे याबाबत आंदोलनही केले. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सदर गेट हा अरुंद तसाच कमी उंचीचा असल्याने याठिकाणातून गणपतीची मूर्ती जाण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा गणपती नेताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागते.